शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

भगवंत मान यांचे मुख्यमंत्रिपद जाणार? केजरीवालांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीवर मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:18 IST

Punjab Politics: आजची होणारी पंजाब कॅबिनेटची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता १३ फेब्रुवारीला घेण्यात येणार असून सर्व आमदारांना मंगळवारी दिल्लीत येण्यास सांगितले आहे.

दिल्लीत आपचे पतन होताच आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या आमदारांची तातडीची बैठक बोलविली आहे. यामुळे आजची होणारी पंजाब कॅबिनेटची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता १३ फेब्रुवारीला घेण्यात येणार असून सर्व आमदारांना मंगळवारी दिल्लीत येण्यास सांगितले आहे. यावरून भाजपाच्या आमदारांनी मोठा दावा केला आहे. 

दिल्लीत सरकार गेल्यानंतर आता आपची ताकद पंजाबमध्येच राहिली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा यांनी दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर केजरीवाल हे पंजाबमध्ये लक्ष घालू शकतात असे म्हटले होते. आपचे अनेक आमदार पक्ष सोडण्याचा विचार करत आहेत. यामुळे आपमध्ये येत्या काळात फेरबदल होताना दिसू शकतो किंवा मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी केली जाऊ शकते, असा दावा बाजवा यांनी केला होता. 

यानंतर ही घडामोड घडत आहे. केजरीवाल लुधियानातून पोटनिवडणूक लढू शकतात, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एका आमदाराच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. अशातच भाजप आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. केजरीवाल हे मुख्यमंत्री भगवंत मान यांना अयोग्य घोषित करून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवू शकतात, असे यात म्हटले आहे. 

महिलांना १००० रुपये देण्याचा वादा पूर्ण करण्यात मान अपयशी आहेत, नशेबाजी रोखण्यास अपयशी ठरले आहेत. तसेच पंजाबची परिस्थिती आणखी खराब केली आहे. आता या साऱ्या गोष्टी ते मान यांच्यावर लादणार आहेत. केजरीवाल एक चांगला माणूस असल्याचे आपच्या आमदारांना बोलायला भाग पाडले जात आहे. त्यांनाच मुख्यमंत्री केले जावे असेही आमदारांच्या तोंडून वदविले जात असल्याचा दावा सिरसा यांनी केला आहे.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूक