शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आशा, २००१ मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापरणार? भाजपाला हरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 5:34 PM

Lok Sabha Election 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे या बैठकीत २००१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनीतीबाबत विशेष चर्चा झाली.

काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी कांग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. नुकतीच लोकसभेची निवडणूक आणि राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस,  प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याच्या विधानसभांमधील काँग्रेच्या नेत्यांना बोलावण्यात आले होते.  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे या बैठकीत २००१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनीतीबाबत विशेष चर्चा झाली.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे सूर काहीसे मवाळ झाले आहेत. काँग्रेसकडून  इंडिया आघाडीतील घटक पक्षांना झुकतं माप दिलं जात आहे. पक्षाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजकपद देण्यासही तयारी दर्शवली आहे. तसेच जागावाटपामध्ये केवळ २५५ जागांवर समाधान मानण्याची मानसिक तयारीही काँग्रेरसच्या नेत्यांनी केली आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने लोकसभेच्या ४२१ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये पक्षाला केवळ ५२ जागा जिंकता आल्या होत्या. आता २०१९ पेक्षा कमी जागा लढवण्यास तयार असलेल्या कांग्रेसने विविध राज्यांमधील स्थानिक पक्षांबाबत मवाळ भूमिका घेण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. दरम्यान, काँग्रेसकडून सध्या उचलण्यात येत असलेली पावले काँग्रेसच्या २००१ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या अधिवेशनात सोनिया गांधींनी आखलेल्या रणनीतीने  प्रभावित झालेली दिसत आहेत.

काँग्रेसच्या २००१ मधील अधिवेशनात सोनिया गांधींनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस १५ पक्षांच्या यूपीए या आघाडीसह  अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीएविरोधात मैदानात उतरेल, असे घोषित केले होते. मात्र २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ६ समविचारी  पक्षांसोबत आघाडी केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेशमध्ये टीआरएस, तामिळनाडूमध्ये डीएमके, झारखंडमध्ये जेएमएम आणि बिहारमध्ये आरजेडी-एलजेपीसोबत आघाडी केली होती. त्यावेळी या राज्यांमध्ये काँग्रेसला जबरदस्त फायदा झाला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये कुठल्याही पक्षासोबत आघाडी केली नव्हती. 

आघाडी केलेल्या पाच राज्यांमधील लोकसभेच्या १८८ जागांपैकी ११४  जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. तर काँग्रेसच्या मित्रपक्षांनी ५६ जागांवर बाजी मारली होती. यावेळीही काँग्रेस २००४ ची रणनीती घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेसने रायपूरमध्ये झालेल्या आपल्या ८५ व्या अधिवेशनामध्ये २०२४ च्या लोकभा निवडणुकीसाठी २००४ मधील रणनीती वापरण्याचे निश्चित केले होते. 

योगायोगाची बाब म्हणजे २००३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पराभवाचा सामना केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन करताना पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. आता त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा