शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

गरज पडल्यास नियंत्रण रेषादेखील ओलांडू; लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 10:08 IST

बालाकोटमधील दहशतवादी तळ पाकिस्तानकडून पुन्हा सक्रीय

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केलेले बालाकोटमधील दहशतवादी तळ पाकिस्ताननं पुन्हा सक्रीय केले आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर फार काळ लपाछपीचा खेळ चालणार नाही. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा गर्भित इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला दिला आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला.फेब्रुवारीमध्ये भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक करत बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र अवघ्या सात महिन्यांमध्ये पुन्हा एकदा बालाकोटमध्ये दहशतवादी सक्रीय झाले आहेत. या भागातून २५० ते ५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकनं नेमकं काय हाती लागलं, असा प्रश्न रावत यांना विचारण्यात आला. त्यावर जोपर्यंत सीमेपलीकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात नाही, तोपर्यंत नियंत्रण रेषा ओलांडणार नसल्याचं उत्तर रावत यांनी दिलं. 'पाकिस्तानकडून दहशतवादी नियंत्रित केले जातात. पाकिस्तानच्याच इशाऱ्यावरुन दहशतवादी कारवाया होतात. मात्र हा लपंडाव फार काळ चालणार नाही. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू. जमिनीवरुन किंवा हवाई मार्गानं नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करण्यास आम्ही कचरणार नाही,' असा स्पष्ट इशारा रावत यांना पाकिस्तानला दिला. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालत नाही, हा पाकिस्तानचा दावा असतो. मात्र पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद्यांची शिबिरं भरतात, हे सत्य आहे. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताविरोधात छुपं युद्ध लढायचं हे पाकिस्तानचं कारस्थान आहे, असंदेखील रावत म्हणाले.  

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी