शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर असा लागेल निकाल, पुन्हा मोदी सरकार की राहुल गांधीचा पलटवार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 23:07 IST

नोटाबंदी, जीएसटी, वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध कारणांमुळे केंद्रातील मोदी सरकारविरोधात असंतोष वाढत आहे. अशा परिस्थितीत  आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर काय निकाल लागू शकतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

नवी दिल्ली - अच्छे दिन आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार सध्या विविध कारणांमुळे टीकेचे धनी होत आहे. मात्र असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरील जनतेचा विश्वास कायम असल्याचे समोर येत आहे. साडे तीन वर्षांनंतरही देशात मोदी लाट कायम असून आजच्या घडीला लोकसभेची निवडणूक झाली तर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा केंद्रात सत्ता स्थापन करेल, असे एक सर्व्हेमधून समोर आले आहे. सी व्होटर या संस्थेने हा सर्व्हे केला असून, या सर्व्हेमध्ये देशभरातील 543 मतदार संघांमधील जनमताचा कानोसा घेण्यात आला आहे.   नोटाबंदी, जीएसटी, वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध कारणांमुळे केंद्रातील मोदी सरकारविरोधात असंतोष वाढत आहे. अशा परिस्थितीत  आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर काय निकाल लागू शकतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण मोदींच्या लोकप्रियतेमुळे भाजपा सरकार लोकसभा निवडणुकीत बाजी मारेल, असा   अंदाज या सर्व्हेंमधून व्यक्त करण्यात आला आहे. हा सर्व्हे 3 डिसेंबर ते 3 जानेवारी या काळात करण्यात आला होता. या सर्वेमधील अंदाजानुसार काही प्रमाणात नुकसान होत असले तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपा घवघवीत यश संपादन करू शकतो. तसेच नितीश कुमार  यांच्या संयुक्त जनता दलासोबत नव्याने झालेल्या आघाडीचाही भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र 2014 साली ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपाची कामगिरी चांगली झाली आहे, अशा ठिकाणी भाजपाच्या जागांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पण पश्चिम बंगाल आणि ओदिशासारख्या राज्यात तसेच पूर्वोत्तर भारतात भाजपाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या स्थितीत 2014 च्या तुलनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही भाजपाच्या तुलनेत काँग्रेच्या जागांमध्ये फारशी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे हा सर्व्हे म्हणतो. मात्र काँग्रेसने स्थानिक पक्षांसोबत आघाडी केल्यास भाजपाच्या अडचणी वाढू शकतात.   पंतप्रधान पदासाठी मोदी सर्वाधिक लोकप्रिय असून, 62.7 टक्के मतदारांनी मोदींना पसंती दिली आहे. तर राहुल गांधीना 12.6 टक्के मतदारांची पसंती आहे. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनाही प्रत्येकी साडे चार टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.  

आता निवडणुका झाल्या तर कुणाला किती जागा - रालोआ - 335 जागा आणि 39.7 टक्के मते- भाजपा - 279 जागा आणि सहकारी 56- संपुआ - 89 जागा आणि 23.6 टक्के मते- काँग्रेस 60 जागा आणि सहकारी 29 - इतर पक्ष - 119 जागा   

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी