शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

न्यायालयाच्या निकालानंतर नीट-यूजी प्रकरणी राहुल गांधी माफी मागणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 09:20 IST

भाजपचा सवाल; परीक्षा पद्धतीची बदनामी केल्याची केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: नीट-यूजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी माफी मागणार का, असा सवाल भाजपने बुधवारी केला आहे. नीट-यूजीची प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर देशातील परीक्षा प्रणालीवर विश्वास उरला नसल्याचे उद्‌गार राहुल गांधी यांनी काढले होते.

५ जून रोजी झालेली परीक्षा रद्द करावी व फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या होत्या. प्रश्नपत्रिका फोडण्याचे व्यापक स्तरावर कारस्थान रचण्यात आले, असे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार काही शहरांतच घडले आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी यांनी टीका करून भारतातील परीक्षा पद्धतीला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेली टीका ही संसदेच्या तसेच विरोधी पक्षनेत्याच्या पदाच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणारी होती.

गैरप्रकारांना आळा घालणारे विधेयक मंजूरप्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार तसेच परीक्षेतील अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बिहार सरकारने एक विधेयक बुधवारी विधानसभेत मंजूर केले. 'बिहार सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक विधेयक असे त्याचे नाव असून, राज्याचे संसदीय कामकाजमंत्री विजयकुमार चौधरी यांनी हे विधेयक सभागृहात मांडले होते. त्यावेळी विरोधकांनी सभात्याग केला.त्याच गदारोळात विधानसभेत ते मंजूर करण्यात आले. बिहारमध्ये नीट- यूजी परीक्षेत घडलेल्या गैरप्रकारांनंतर तेथील राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीneet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीक