शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

मसूद अजहरविषयी चीन भूमिका बदलेल?

By admin | Published: December 31, 2016 2:36 AM

पाकिस्तानातील दहशतवादी मसूद अजहर व त्याची जैश-ए-मोहम्मद ही संघटना याबाबतची आपली भूमिका येत्या काही दिवसांत चीन स्पष्ट करणार आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी मसूद अजहर व त्याची जैश-ए-मोहम्मद ही संघटना याबाबतची आपली भूमिका येत्या काही दिवसांत चीन स्पष्ट करणार आहे. चीन काय निर्णय घेतो, याकडे भारताचे लक्ष आहे. चीनच्या निर्णयानंतर भारत पुढील पाऊल उचलणार आहे. चीनने आतापर्यंत अजहर मसूदला दहशतवादी म्हणून घोषित करण्यास विरोध केला आहे. तसेच ३१ मार्च रोजीही त्याला दहशतवादी घोषित करण्यापासून रोखत, चीनने आडकाठी केली होती.मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात यावे, असा भारताता सातत्याने प्रयत्न आहे. चीनने मात्र विरोध केला होता. चीनच्या या विरोधाच्या भूमिकेबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चीनने केलेला विरोध केवळ तांत्रिक आधारावर व कारणास्तव असून, तो अनाकलनीय आहे, अशी टीका भारताने यापूर्वीही केली आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले गेल्यास त्याची सर्व संपत्ती जप्त करणे शक्य होईल आणि त्याला अन्य देशांमध्ये जाताही येणार नाही. त्यांच्या देशांतर्गत कारवायांवरही आपोआप बंधने येतील. मात्र या प्रस्तावाला चीनने व्हेटोचा अधिकार वापररून विरोध केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील पाच सदस्यांना व्हेटो वापरण्याचा अधिकार आहे. त्यात चीनचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील पाच कायम सभासद राष्ट्रांमध्ये अमेरिका, रशिया, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स हे देश आहेत. मात्र चीनने आतापर्यंतची भूमिका बदलून मसूद अजहरला दहशतवादी म्हणून घोषित करण्यास संमती दिल्यास वा प्रस्तावाला विरोध न केल्यास मसूद अजहर, त्याची संघटना आणि पाकिस्तान असे सारेच अडचणीत येतील. तो व जैश-ए-मोहम्मदची दहशतवाद्यांच्या यादीत नोंद होईल. नोव्हेंबरमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभल यांनी चीनच्या सुरक्षा सल्लागारांशी यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी चीनने आपण निर्णय बदलणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दहशतवादी लढताना दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही आणि दहशतवादाचा कोणीच राजकीय फायदा घेता कामा नये, असे चीनने म्हटले आहे. अशा स्थितीत चीनने मसूदबाबतच्या प्रस्तावाला विरोध केला, तर चीन आपल्याच भूमिकेला बगल देत आहे, असे चित्र निर्माण होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)- चीनने पुन्हा विरोध केल्यास काय पावले उचलायची, याची तयारी भारताने करून ठेवली आहे. त्या स्थितीत भारताकडून मसूद अजहरचा भाऊ अब्दुल रौफ असगर तसेच लष्कर-ए-तयब्बा व जैश-ए-मोहम्मदच्या अन्य दहशतवाद्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो.- राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) मसूद अजहर हाच पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांची यादीत टाकण्यात यावे, असा भारताचा आग्रह आहे.