शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वक्फ बोर्डाने बळकावलेली एकेक इंच जमीन परत घेणार; कुंभमेळ्यापूर्वी योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:03 IST

उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. अशातच या कुंभमेळ्याला मुस्लिम व्यक्तींवर बंदी घालण्यात आली असून यावरून महाकुंभमेळ्याची जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा मौलवींनी केल्याने वादास तोंड फुटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. अशातच या कुंभमेळ्याला मुस्लिम व्यक्तींवर बंदी घालण्यात आली असून यावरून महाकुंभमेळ्याची जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा मौलवींनी केल्याने वादास तोंड फुटले आहे. यावर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. 

वक्फच्या नावावर कब्जा केलेली एकेक इंच जमीन राज्य सरकार काढून घेणार आहे. हे वक्फ बोर्ड आहे की भूमाफिया बोर्ड हेच सांगता येणार नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. राज्य सरकारने वक्फ बोर्डाच्या नियमांत बदल केला आहे. आता त्यांच्या ताब्यात असलेली जर्व जमीन तपासली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

वक्फ बोर्डाच्या नावावर हडपलेली सर्व जमीन सरकार ताब्यात घेईल आणि त्याचा वापर गरीबांसाठी घरे, शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल बांधण्यासाठी केला जाईल, असे ते म्हणाले. सनातन धर्माची प्रतिमा ही आकाशापेक्षा उंच आणि समुद्रापेक्षा खोल आहे. सनातन धर्माची तुलना कोणत्याही संप्रदाय किंवा धर्माशी केली जाऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच कुंभाची परंपरा वक्फपेक्षा खूप प्राचीन असल्याचे म्हटले आहे. 

शंकराचार्यांनीही बाजी पलटवली...महाकुंभ वक्फच्या जागेवर होत असलेल्या दाव्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जर प्रत्येक मशिदीखाली जर मंदिरे सापडत असतील तर महाकुंभ वक्फच्या जमिनीवर होत असल्याचा दावा जर कोणी करत असेल तर त्यात चुकीचे काय आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. असा दावा कोणीही करू शकतो. ज्याची जमीन त्याला ती मिळायला हवी, असे शंकराचार्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश