शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

देशद्रोहाचा कायदा रद्द होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर विधी आयोगाने केंद्राकडे अहवाल सोपविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 10:47 IST

कलम 124A च्या गैरवापरावरील मतांची दखल घेऊन ते रोखण्यासाठी केंद्राने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

विधी आयोगाने देशद्रोहाच्या कायद्यावरीव आपला अहवाल गुरुवारी केंद्र सरकारला सोपविला आहे. यामध्ये देशद्रोहाचा सामना करण्यासाठी आयपीसीचे कलम 124A कायम ठेवण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. या कायद्यामध्ये अधिक स्पष्टता देण्यासाठी काही सुधारणा केल्या जाऊ शकतात, असा सल्लाही देण्यात आला आहे. 

कलम 124A च्या गैरवापरावरील मतांची दखल घेऊन ते रोखण्यासाठी केंद्राने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना 22 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रितू राज अवस्थी (निवृत्त) यांनी त्यांच्या बंद लिफाफ्यामध्ये काही सूचना दिल्या आहेत. 

आयपीसीच्या कलम 124A सारख्या तरतुदीच्या अनुपस्थितीत, सरकारच्या विरोधात दंगल भडकवण्याच्या कोणत्याही अभिव्यक्तीवर निश्चितपणे विशेष कायदे आणि दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. यामध्ये अधिक कठोर तरतुदी आहेत. 

सर्व देश आपली परिस्थिती पाहून निर्णय घेतात. यामुळे त्यांनी त्यांचे देशद्रोहाचे कायदे रद्द केले तरी तसा निर्णय आपण घेऊ शकत नाही. कारण तसे केल्यास भारतातील वास्तवाकडे डोळेझाक केल्यासारखे होईल, असे आयोगाने म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना कलम 124A संदर्भात चालू असलेल्या सर्व तपासांना स्थगिती देताना कोणतीही एफआयआर नोंदवण्यापासून किंवा कोणतीही कारवाई करण्यास स्थगिती दिली होती. यानंतर केंद्र सरकारने विधी आयोगाकडे या कायद्यावर पुर्नविचार करण्याची जबाबदारी सोपविली होती. आता आयोगाच्या अहवालानंतर केंद्र सरकार पावसाळी अधिवेशनात देशद्रोह कायद्यात सुधारणा करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :seditionदेशद्रोहSupreme Courtसर्वोच्च न्यायालय