शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

वरुण गांधी लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देणार, तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 21:19 IST

Varun Gandhi News: पक्षनेतृत्वावर नाराज असलेले Varun Gandhi हे लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन Trinamool Congressमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. वरुण गांधी हे सध्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

नवी दिल्ली - भाजपाच्या प्रमुख युवा नेत्यांपैकी एक असलेले वरुण गांधी गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. तसेच ते केंद्र सरकारकडून घेतले गेलेले निर्णय तसेच पक्षाच्या धोरणांविरोधात सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, पक्षनेतृत्वावर नाराज असलेले वरुण गांधी हे लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. वरुण गांधी हे सध्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत. तसेच पुढच्या आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान, वरुण गांधी त्यांची भेट घेणार असून, त्यात तृणमूलमधील प्रवेशाबाबतची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता आहे.

वरुण गांधी हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. तसेत आपल्या वक्तव्यामधून भाजपा आणि भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारांवर टीका करत असतात. केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भाजपाच्या कार्यकारिणीमधूनही वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. तेव्हापासून वरुण गांधी भाजपाविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर लखीमपूर हिंसेवरून चौफैर टीका केली होती. तसेच महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य दिनावरून सोशल मीडियावर आक्रमकपणे भूमिका मांडली होती.

पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर आता तृणमूल काँग्रेस देशभरात काँग्रेसला पर्याय ठरण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच हिंदी भाषी आणि अन्य राज्यांमध्ये प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ममता बॅनर्जी पुढच्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. त्यादरम्यान वरुण गांधी यांच्यासोबत त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये एका प्रस्थापित नेत्याचा शोध तृणमूल काँग्रेसकडूनही घेण्यात येत आहे.

दुसरीकडे वरुण गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशमधील प्रभारी प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा झाल्याची चर्चाही उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र त्या चर्चेचे परिणाम अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान, याबाबत भाजपाच्या नेत्याने सांगितले की, वरुण गांधींची प्रियंका गांधींशी भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र जर त्यांनी पक्ष सोडला तर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांना अधिक पर्याय नाही आहेत. तसेच हिंदी भाषिक राज्यांमध्ये पकड मिळवण्यासाठी तृणमूल काँग्रेसला थोडा वेळ लागणार आहे.  

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस