शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

वायएसआर काँग्रेस इंडिया आघाडीसोबत येणार? जगन मोहन रेड्डींना पाठिंबा देण्यासाठी अखिलेश यादव, संजय राऊत पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 16:58 IST

वायएसआर काँग्रेसचे जनग मोहन रेड्डी काही दिवसातच इंडिया आघाडीमध्ये सामील होणार आहेत, अशा चर्चा सुरू आहेत.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंध्र प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी आंध्रच्या तेलगू देसम पक्षावर राजकीय सूडबुद्धीने काम केल्याचा आरोप केला आहे. जगन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारवर राज्यात हिंसाचार पसरवल्याचा आणि वायएसआरसीपी कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. दरम्यान, आता या आंदोलनाला राजकीय वर्तुळातून पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्षांकडून पाठिंबा दिला जात आहे. या आंदोलनाला इंडिया आघाडीनेही पाठिंबा दिल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार अखिलेश यादव यांनी रेड्डी यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यामुळे आता जगन मोहन रेड्डी इंडिया आघाडीसोबत जोणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

अर्थसंकल्पात मोदी सरकारची एक घोषणा, चीनचं टेन्शन वाढणार...! भारताला होऊ शकतो मोठा फायदा

सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव यांनी जगन मोहन यांच्या आंदोलनात हजेरी लावली, तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी आणि अरविंद सावंत यांनीही हजेरी लावली. यावेळी टीएमसीचे नजीबुल हक आणि जेएमएमचे विजय हंसडा, आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतम आणि एआयएडीएमके नेते थंबी दुराई हेही रेड्डी यांना पाठिंबा दिला. यादरम्यान, तामिळनाडूच्या व्हीसीके पक्षाने जगन मोहन यांना इंडिया आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले.

खासदारांच्या संख्याबळाची आठवण करुन दिली

दुसरीकडे, जगन मोहन रेड्डी यांनी एनडीएकडे १५ खासदार असल्याची आठवण करून दिली. वायएसआरसीपीचे राज्यसभेत ११ खासदार आहेत, तर लोकसभेत टीडीपीच्या खासदारांची संख्या १६ आहे. या पक्षाचे लोकसभेत ४ खासदार आहेत. आमची आणि टीडीपीची ताकद समान आहे, अशी आठवणही त्यांनी करुन दिली. 

जंतरमंतरवर माध्यमांसोबत बोलताना जगन मोहन रेड्डी म्हणाले, 'आज ते राज्यात सत्तेत आहेत. कालपर्यंत आम्ही सत्तेत होतो. उद्या आपण पुन्हा सत्तेत येऊ शकतो. पण आम्ही अशा वर्तनाचे कधीच समर्थन केले नाही. आम्ही कधीही हल्ल्यांना आणि मालमत्तेचे नुकसान करण्यास प्रोत्साहन दिले नाही. मात्र टीडीपीचे सरकार आल्यानंतर आंध्र प्रदेशातील परिस्थिती आज पूर्णपणे वेगळी आहे.

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशात लोकशाही आहे की नाही. राज्यात नवे सरकार आल्यानंतर ४५ दिवसांत ३० हून अधिक लोकांची हत्या झाली आहे. अनेक मालमत्तांचीही नासधूस झाली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश राज्यभर लाल किताब प्रदर्शित करत आहे. या लाल किताबात त्या नेत्यांची नावे आहेत ज्यांच्यावर ते कारवाई आणि हल्ले करतील. असे होर्डिंग राज्यभर लावले जातात, असंही माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले. 

सत्तेत आल्यानंतर विरोधकांना अशा प्रकारे टार्गेट करू नये, असे अखिलेश यादव म्हणाले. विरोधकांचा आवाजही ऐकायला हवा. लोकशाहीत आलेला बुलडोझरचा ट्रेंड आम्हाला मान्य नाही, असंही अखिलेश यादव म्हणाले. धमक्या देणारे लोक सत्तेत जास्त काळ टिकत नाहीत.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी