शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
3
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
4
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
5
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
6
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
7
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
8
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
9
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
10
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
11
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
12
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
13
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
14
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
15
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
16
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
17
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
18
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
19
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
20
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार

भाजपामध्ये आता बदलांचे वारे; निवडणुकांमुळे मध्य प्रदेश अन् राजस्थानकडे अधिक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 6:51 AM

पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी हे बदल करणे गरजेचे बनले आहे. 

- संजय शर्मानवी दिल्ली : भाजपमध्ये बदलाचे वारे वाहत असले तरी सर्वांच्या नजरा राजस्थान व मध्य प्रदेशकडे लागलेल्या आहेत. या राज्यांतील विधानसभा निवडणुका भाजप कोणाच्या नेतृत्वात लढतो, याची उत्सुकता आहे. कर्नाटकात प्रचंड असंतोष असला तरी भाजपने नेतृत्व बदलास इन्कार केला. त्रिपुरामध्ये विप्लव देव यांच्या जागी माणिक साहा यांच्याकडे सूत्रे दिली. राज्यांत बदल गरजेचे असले तरी याची किंमत चुकवावी लागत आहे. मात्र पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी हे बदल करणे गरजेचे बनले आहे. 

मध्य प्रदेश : चौहान यांना अभय

मध्य प्रदेशात बदल गरजेचा आहे, अशी स्थिती निर्माण झाल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व प्रदेशाध्यक्ष व्ही.डी.  शर्मा यांना बदलले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. तथापि, यापूर्वीही अनेकदा अशा चर्चा झालेल्या असल्या तरी चौहान यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. प्रत्येकवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौहान यांना वाचविले आहे. 

त्रिपुरा : सूत्रे साहांकडे 

२०२३ मध्ये सर्वप्रथम त्रिपुरात विधानसभा निवडणुका होतील. तेथे भाजपने काही दिवसांपूर्वीच विप्लव देव यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून माणिक साहा यांना मुख्यमंत्री केले. अनेक वर्षांपासून डाव्यांचा बालेकिल्ला असलेले हे राज्य भाजपला कोणत्याही स्थिती हातून जाऊ द्यायचे नाही, त्यामुळे त्रिपुरा भाजपसाठी महत्त्वाचे मानले जाते.

कर्नाटक : धुसफूस सुरूच

कर्नाटकमध्ये सत्ताविरोधी लाटेची शक्यता स्पष्ट दिसत असतानाही अखेरच्या वेळी भाजपने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कातील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढण्याचे निश्चित केले. बी. एस. येदीयुरप्पा यांना हटवून भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले होते. परंतु बोम्मई याच्याबाबतचा असंतोष दाबण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वापरण्यात येईल व लिंगायत समुदायाचे ज्येष्ठ भाजप नेते येदीयुरप्पा यांना खुश ठेवण्यासाठी त्यांचे पुत्र विजयेंद्र यांना पक्षात चांगले स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. नलीनकुमार कातील यांच्या आरोग्याचे कारण असले तरी ऐनवेळी भाजप ना मुख्यमंत्री बदलणार आहे, ना प्रदेशाध्यक्ष बदलेल.

राजस्थान : एकजूट नाही 

राजस्थानमध्ये भाजप अनेक गटांत विभागलेला दिसत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सतीश पुनिया, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे वेगवेगळ्या गटांचे नेते आहेत. येथे कोणत्याही एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजप एकजूट होत नाही. त्यामुळे राजस्थानमध्ये भाजप विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच लढेल, असे म्हटले जात आहे.

छत्तीसगड : माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्याशिवाय दुसरा मोठा नेता नाही. नेतृत्वात बदल करूनही भाजप पूर्वी जेथे होता तेथेच आहे.

तेलंगणा : भाजप कमजोर आहे. राज्यात जे नेते भाजपमध्ये आलेले आहेत ते काँग्रेस किंवा केसीआर यांच्या पक्षातून आलेले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह