शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

 विंग कमांडर अभिनंदन यांचा आयएसआयने 40 तास केला होता छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 09:52 IST

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र....

नवी दिल्ली - एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन यांचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन हे सुरुवातीला पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. त्यानंतर त्यांनी आयएसआय या कुख्यात गुप्तहेर संघटनेकडे सोपवण्यात आले होते. 

संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांचे विमानही दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना ताब्यात घेऊन सुमारे चार तास त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना आयएसआयच्या ताब्यात देण्यात आले. आयएसआयचे अधिकारी त्यांना इस्लामाबाद येथून रावळपिंडी येथे घेऊन गेले. तिथे अभिनंदन यांना  सुमारे 40 तास स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले. तिथे त्यांचा अनन्वित छळ करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला. अभिनंदन यांना इस्लामाबाद येथून रावळपिंडी येथे नेताना डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. त्यामुळे त्यांना काहीही दिसत नव्हते. तसेच आयएसआयने त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्यांना मारहाण केली. त्यामुळे अभिनंदन यांच्या उजव्या डोळ्याभोवती काळ्या डागाचे निशाण तयार झाले आहे.   एकीकडे एवढी मारहाण होत असताना अभिनंदन यांच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. मात्र भारतीय प्रसारमाध्यमांनी त्यांच्यासंदर्भातील सर्व माहिती सांगून टाकली. दरम्यान, इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत अभिनंदन यांना मुक्त करण्याची घोषणा केली. मात्र आयएसआय अभिनंदन यांची सुटका करण्यास तयार नव्हती. 

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी विमानांनी दुसऱ्या दिवशी त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानी लढाऊ विमानांचा हा हल्ला भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते. मात्र या चकमकीदरम्यान अभिनंदन यांचे मिग विमान दुर्घटनाग्रस्त झाले. त्यामुळे अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले होते. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानindian air forceभारतीय हवाई दलIndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक