शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

डॉ. आंबेडकरांबद्दल वक्तव्यावरून गदारोळ; अमित शाह यांनी राजीनामा द्यावा; विरोधकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 05:25 IST

संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ, नागपूरमध्ये विधिमंडळातही पडसाद; शाह म्हणाले, वक्तव्याचा काँग्रेसने विपर्यास केला, त्यांना अजून १५ वर्षे विरोधी बाकांवरच बसायचेय

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे बुधवारी देशभरात पडसाद उमटले. संसदेत विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 'जय भीम'च्या घोषणांनी संसद दणाणून गेली होती. विरोधकांनी संसदेच्या आवारात निदर्शनेही केली.

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत विरोधकांनी लोकसभा व राज्यसभा यादोन्ही सभागृहात गदारोळ केला. सुरुवातीला दोन्ही सभागृहांचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले. दुपारी दोन वाजेनंतर परत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर पलटवार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार केलेला अपमान भाजप नेत्यांनी उघड केला होता. त्यामुळेच माझ्या भाषणातील डॉ. आंबेडकरांबाबतच्या उल्लेखाचा काँग्रेसने विपर्यास करून त्यावर गदारोळ माजविला, असा दावा त्यांनी केला.

वक्तव्यांची मोडतोड करून त्याच्या आधारे अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसचा मी निषेध करतो

गृहमंत्री शाह यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, याआधीदेखील काँग्रेसने माझ्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यांचा विपर्यास करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. वक्तव्यांची मोडतोड करून त्याच्या आधारे अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसचा मी निषेध करतो; पण काँग्रेस या साऱ्या गोष्टी का करत आहे? एनडीए सरकारने राज्यघटनेचे कसे रक्षण केले, हे भाजपच्या नेत्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले होते. तसेच काँग्रेस हा पक्ष डॉ. आंबेडकर, राज्यघटना, राखीव जागा यांच्या विरोधात कसा उभा ठाकला आहे, याचे दाखलेही भाजप नेत्यांनी संसदेत बोलताना दिले. त्यामुळेच काँग्रेसने आता माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना आनंद होणार असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे; पण त्यामुळे खरगे यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असेही शाह म्हणाले.

अमित शाह यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही काँग्रेसने अपमान केला आहे. देशात आणीबाणी लागू करून राज्यघटनेच्या तत्त्वांचा या पक्षाने भंग केला आहे. त्या साऱ्या गोष्टींची आता पुन्हा चर्चा झाल्याने काँग्रेसने आपली जुनी खेळी केली आहे. त्यांनी गोष्टींचा विपर्यास करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. भाजप डॉ. आंबेडकर यांचा कधीही अपमान करणार नाही, असेही ते म्हणाले.

विधानसभेत पडसाद : अमित शाह यांच्या विधानाचे पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले. विधान परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण का करता, असा सवाल उपस्थित करत पराभवाचे शल्य लपवायचे असेल, तर बाहेर आंदोलन करा, अशा शब्दांत उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी विरोधकांना सुनावले. संविधानामुळेच हे लोक मंत्री होऊ शकले, यांना संविधानाची इतकी अडचण का होते, असा प्रश्न काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी विधानसभेत केला.

हे त्यांच्या जुन्या मानसिकतेचेच लक्षण: प्रकाश आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितीवेळी जनसंघाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध होता. आताही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध आहे. त्यामुळे मंगळवारी संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकरांविषयी केलेले वक्तव्य हे त्यांच्या जुन्या मानसिकतेचेच लक्षण आहे. त्यात नवीन काहीच नाही. त्यावेळी त्यांचे असलेले नियोजन अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही, त्यामुळे त्यांचा जळफळाट होत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

गृहमंत्री अमित शाहांनी संविधान निर्मात्यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या काळ्या इतिहासाची पोलखोल केली आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष स्तब्ध आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधानाचा अपमान देश कदापिही सहन करू शकत नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागावी. - राहुल गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते

टॅग्स :ParliamentसंसदDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह