शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

काही न करताच ढोल कसले बडवता?

By admin | Published: May 17, 2017 5:03 AM

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीचा मोठा डंका पिटण्याच्या भाजपाच्या योजनेवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीचा मोठा डंका पिटण्याच्या भाजपाच्या योजनेवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या, वाढती बेरोजगारी, न पाळलेली आश्वासने आणि अनेक बाबतीत आलेले घोर अपयश याखेरीज मोदी सरकारकडे दाखविण्यासारखे आहे काय, मग ते नेमका कशाचा जल्लोष करीत आहेत, असा घणाघात त्यांनी केला. सरकारने तीन वर्षांत केवळ लोकांचा विश्वासघात केला आहे, असे ते म्हणाले. राहुल टिष्ट्वटमध्ये म्हणतात, तरुण नोकऱ्यांसाठी संघर्ष करीत आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, सीमेवर सैनिकांचा बळी जात आहे, अशात सरकार नेमके कशाचा आनंदोत्सव साजरा करीत आहे. राहुल यांनी रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर यापूर्वीही सरकारवर हल्ला केला आहे. सरकारला एक वर्षात रोजगाराच्या एक कोटी संधी निर्माण करण्याचे आपले आश्वासन पाळता आलेले नाही. सरकारकडे दूरदृष्टी नसल्यामुळे तरुण वर्गात निराशा पसरली आहे, असेही ते म्हणाले. भाजपा केंद्रात आपल्या सरकारचे तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर मोदी उत्सवाचे आयोजन करीत आहे. तथापि, येथे मोदी म्हणजे पंतप्रधानांचे नाव नाही तर मेकिंग आॅफ डेव्हलपिंग इंडिया याचे ते लघुरूप आहे. या उत्सवाची सुरुवात २६ मे रोजी गुवाहाटी येथून होणार असून, १५ जून रोजी त्याची सांगता होईल. हा उत्सव देशभर आयोजित करण्यात येणार असून, यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात किमान एका सोहळ्याचे आयोजन होणार आहे.हा कसला आनंदोत्सव? तरुण नोकऱ्यांसाठी संघर्ष करीत आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, सीमेवर सैनिकांचा बळी जात आहे, अशात सरकार नेमके कशाचा आनंदोत्सव साजरा करीत आहे.