शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

'ट्रेनच्या खिडक्यांमधून...; तरुणीने तक्रार करताच नेटकऱ्यांनी वाचली वंदे भारतमधल्या त्रुटींची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:35 IST

Vande Bharat Express : एकीकडे वंदे भारत एक्सप्रेसचे कौतुक होत असताना दुसरीकडे प्रवाशांकडून ट्रेनमध्ये असलेल्या त्रुटींबाबतही प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Vande Bharat Express : वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी अनेकजण आतुरतेने वाट पाहतायत. बाह्य किंवा आंतरिक सौंदर्यासोबत वंदे भारत ट्रेन वेग आणि निसर्गरम्य दृश्यांपेक्षा बरेच काही अनुभवत देते.त्यामुळे अनेकजण आपल्या प्रवासाबद्दलही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. मात्र वंदे भारतबद्दल एका तरुणीने तिला आलेला वाईट अनुभव शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झालीय.

देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारतबाबत लोक खूप उत्सुक आहेत. मंत्र्यांपासून, अभिनेते आणि ब्लॉगर्सपर्यंत सर्वांनी वंदे भारतने  प्रवास करण्याबाबत आपापली मते मांडली आहेत. मात्र आता एका तरुणीने या ट्रेनबद्दलचा तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. वंदे भारत संदर्भात महिलेने सोशल मीडियावर केलेली टिप्पणी सध्या व्हायरल झाली आहे.

कोलकातमधल्या एका तरुणीने वंदे भारतमधील तिच्या पहिल्या प्रवासाबद्दल आणि जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक बाबी शेअर केल्या आहेत. @epicnephrin_e या नावाने युजरच्या मते वंदे भारतच्या खिडक्या सूर्यप्रकाश रोखण्यासाठी पुरेशा प्रभावी नाहीत. तरुणीने सांगितले की, संपूर्ण प्रवासादरम्यान तिला तिच्या डेनिम जॅकेटने तिचा चेहरा झाकावा लागला होता.

तरुणीने वंदे भारत ट्रेनमधील जेवण देखील सामान्य असल्याचे म्हटलं. जेवणाबद्दल बोलताना तरुणीने म्हटलं की वंदे भारतमधील जेवण हे शताब्दीमधील गाड्यांमधील सरासरी भाड्याइतके आहे. मात्र, दुपारचे जेवण समाधानकारक असल्याचे तरुणीने सांगितले. स्वयंचलित दरवाजे आणि स्वच्छ स्वच्छतागृहांमुळे तरुणी प्रभावित झाली. ट्रेनमधील सर्व सूचनांसाठी तरुणीने ब्रेल लिपीतील भाषांतराचे कौतुक देखील केले. तरुणीने ट्रेनमधील तिचा संपूर्ण अनुभव फोटोंच्या माध्यमातून शेअर केला.

तरुणीच्या वंदे भारतच्या पोस्टला १.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दुसरीकडे या पोस्टवर नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने वंदे भारतमध्ये सर्वात खराब ओव्हरहेड सामानाचे शेल्फ आहेत, असं म्हटलं आहे. ते शेल्फ खूपच अरुंद आहेत आणि बॅग बाहेर पडू नयेत यासाठीच पुरेसे आहेत, असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने, "होय मलाही याच समस्येचा सामना करावा लागला,जेवण देखील पूर्णपणे दयनीय आहे," असं म्हटलं आहे. "ट्रेनचा वेग वाढल्यावर एसी नीट काम करत नाही. ओव्हरहेड सामानाच्या जागेमुळे खिडकीच्या सीटला थंड हवा मिळत नाही. लोकांसाठीही मधल्या जागा अत्यंत अस्वस्थ असतात, असेही एका युजरने सांगितले. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेSocial Mediaसोशल मीडिया