शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पतीच्या 'या' सवयी कंटाळलेल्या पत्नीने केली घटस्फोटाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 11:41 IST

क्षुल्लक कारणांवरुन घटस्फोट मागितल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. मध्य प्रदेशचा राजधानी भोपाळमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देभोपाळमध्ये पतीच्या सात-आठ दिवस अंघोळ आणि दाढी न करण्याच्या वाईट सवयीला कंटाळलेल्या पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आहे.भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण आहे.पती घरातील सामान नीटपणे ठेवत नाही असं देखील पत्नीने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.

भोपाळ - संसारात पती पत्नीत अनेक कारणांवरून भांडणं ही होत असतात. काही वेळा सततच्या भांडणाला वैतागून घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय देखील घेतला जातो. क्षुल्लक कारणांवरुन घटस्फोट मागितल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. पण जर कोणी पती अंघोळ करत नाही म्हणून घटस्फोट घेतल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. मध्य प्रदेशचा राजधानी भोपाळमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. पती सात-आठ दिवस अंघोळ आणि दाढी करत नाही म्हणून एका पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमध्ये पतीच्या सात-आठ दिवस अंघोळ आणि दाढी न करण्याच्या वाईट सवयीला कंटाळलेल्या पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आहे. 25 वर्षाचा तरुण आणि 23 वर्षाची तरुणी यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. पतीच्या वाईट सवयीला पत्नी कंटाळली होती. तिने अनेकदा पतीला समाजून या सवयीत बदल करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने अद्याप आपल्या सवयीत बदल केलेला नाही. यामुळेच पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण आहे. दोघांच्या संमतीनंतर त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे समुपदेशक शैल अवस्थी यांनी सांगितले. घटस्फोट हवा असल्यास दोघांना सहा महिने एकमेकांपासून दूर राहावे लागेल असे न्यायाधीश आर.एन.चंद यांनी सांगितले आहे. 

आंघोळ न केल्याने पतीच्या शरीराचा दुर्गंध येतो आणि अंघोळ करण्यास सांगितल्यावर तो कपड्यांवर अत्तर लावतो अशी तक्रार असल्याची माहिती मिळत आहे. पती घरातील सामान नीटपणे ठेवत नाही असं देखील पत्नीने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. तसेच भविष्याचा विचार करता पती पैसे वाचवत नाही असं पत्नीचं म्हणणं आहे. दरम्यान दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आता न्यायालयाने दोघांना सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. माझे आयुष्य आहे. ते कसे जगायचे हे मी ठरवेन. पत्नीने मला सांगायची गरज नाही असे पतीने म्हटले आहे. तसेच पत्नीच्या सांगण्यावरून आपण बदलणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Divorceघटस्फोटMadhya Pradeshमध्य प्रदेश