शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

Draupadi Murmu: महिलांनो, सक्रिय होऊन ग्रामपंचायती चालवा, राष्ट्रपतींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 09:00 IST

Draupadi Murmu: महिलांनी ग्रामपंचायतींच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. त्याचबरोबर पंचायत निवडणुकांबाबत ग्रामस्थांत तंटे होऊ नयेत. शक्यतो सर्व सामुदायिक कामे परस्पर सहमतीने व्हायला हवीत, असे त्या म्हणाल्या. 

नवी दिल्ली : महिलांनी ग्रामपंचायतींच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. त्याचबरोबर पंचायत निवडणुकांबाबत ग्रामस्थांत तंटे होऊ नयेत. शक्यतो सर्व सामुदायिक कामे परस्पर सहमतीने व्हायला हवीत, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रपतींनी गुजरात सरकारच्या ‘समरस ग्राम योजने’वर प्रकाश टाकला, या योजनेंतर्गत सहमतीच्या आधारे पंचायत प्रतिनिधी निवडणाऱ्या गावांना पुरस्कृत करण्यात येते.

राष्ट्रपतींनी राष्ट्रीय पंचायत प्रोत्साहन अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुर्मू म्हणाल्या की, कोणत्याही समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. ‘स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी महिलांना अधिकाधिक निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. मी भगिनींना व मुलींना आवाहन करेन की, त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३१.५ लाखांहून अधिक निवडून आलेल्या प्रतिनिधींपैकी ४६ टक्के महिला असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी दर पाच वर्षांनी पंचायत प्रतिनिधी निवडण्याची तरतूद आहे, मात्र या निवडणुकांमुळे कधी कधी लोकांमध्ये कटुता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीबाबत ग्रामस्थांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, हे लक्षात घेऊन पंचायत निवडणुका राजकीय पक्षांपासून वेगळ्या ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पाच ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार सांगली जिल्ह्यातील खंडोबाची वाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील पाच ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अलाबाद ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत