शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

मुलांना जबाबदार केल्यानेच महिला होतील सुरक्षित- मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:24 IST

मोदींचा संस्कारवर्ग: कुटुंबापासूनच जनआंदोलन सुरू व्हावे

मांडला (मध्य प्रदेश) : बलात्कारांसारख्या हीन गुन्ह्यांविषयी सरकार संवेदनशील असून, अशा गुन्हेगारांना प्रसंगी फाशीही देण्याचा वटहुकूम सरकारने काढला आहे. पण कुटुंबांमध्येच महिलांना अधिक सन्मान दिला गेला आणि मुलांना अधिक जबाबदार बनविले गेले तर महिला अधिक सुरक्षित होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे सांगितले.अशा प्रकारच्या संस्कारांची सुरुवात प्रत्येक कुटुंबातून व्हावी व त्यातून एक जनआंदोलन उभे राहावे. तसे झाले तर महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे कठीण नाही, असेही पंतप्रधानांनी सुचविले. मांडला या आदिवासीबहुल जिल्ह्यातील रामनगर येथे राष्ट्रीय पंचायत राज सम्मेलनात मोदीबोलत होते. सरकार आपले काम करतच असते. पण केवळ कडक कायदे केल्याने जेवढे फलित मिळणार नाही त्याहून अधिक यश सामाजिक पातळीवर जनआंदोलन उभे केल्याने मिळेल, असे ते म्हणाले. मोदी म्हणाले की, कडक शिक्षेच्या तरतुदीने तुम्ही खुश झाल्याचे तुमच्या टाळ्यांतून व्यक्त झाले. लोकांची हीच भावना लक्षात घेऊन सरकारने कायदा अधिक कडक केला. पण महिला सुरक्षेसाठी कौटुंबिक सुसंस्कार आणि सामाजिक आदोलनही हवे, यावर त्यांनी भर दिला.

पहिला कायदा मध्य प्रदेशातमोदी यांच्या आधी बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी १२ वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद सर्वप्रथम मध्य प्रदेशने केली आणि आता केंद्रानेही देशासाठी तसाच कायदा केला, याचा उल्लेख केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी