शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

‘त्यांना घेरून काम फत्ते करा’

By admin | Published: November 05, 2016 6:00 AM

सिमीच्या आठ जणांच्या एनकाऊंटरवरून सुरू झालेल्या वादात आता आणखी भर पडली

भोपाळ : सिमीच्या आठ जणांच्या एनकाऊंटरवरून सुरू झालेल्या वादात आता आणखी भर पडली आहे. सोशल मीडियातील एका आॅडिओने चर्चेला तोंड फोडले आहे. ‘त्यांना घेरून काम फत्ते करा’ अशी चर्चा या आॅपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सुरक्षारक्षकांत झाल्याची ही आॅडिओ टेप आहे. या टेपमुळे मध्य प्रदेश सरकार अडचणीत आले आहे.भोपाळच्या तुुरुंगातून पळून गेल्यानंतर या आठ जणांचे एन्काऊंटर करण्यात आले होते. या आॅडिओ टेपमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे की, दोन जणांतील संवादात एक व्यक्ती दुसऱ्याला फायरिंगचे आदेश देत आहे. या पोलिसाला सावध राहण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस टीमशी संवाद साधण्यासाठी वायरलेसऐवजी फोनचा उपयोग करण्याचेही यात सुचविण्यात आले आहे. याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक अनुराग शर्मा म्हणाले की, या सर्व बाबींचा तपासात समावेश करण्यात आला आहे. आपण अद्याप ही क्लिप ऐकली नाही. दरम्यान, पोलीस महानिरीक्षक योगेश चौधरी म्हणाले की, आॅडिओचे हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे पाठविण्यात येईल. या दोन्ही आॅडिओ टेप नऊ मिनिटांच्या आहेत. यातील काही संभाषणात असेही म्हटले आहे की, ‘पटेलसाहब, निपटा दो’, ‘उन्हे जल्दी खत्म कर दो.’ काही जणांचे एनकाऊंटर करण्यात आल्यानंतर या टीममधील कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केल्याचेही क्लिपमधून ऐकण्यास मिळत आहे. ‘पाच जणांना मारले आहे, तिघांचे आॅपरेशन सुरू आहे,’ असेही या क्लिपमध्ये म्हटले आहे. ‘गो अहेड, बिलकूल नहीं पिछे हटना है. घेर के करो पुरा काम तमाम,’असेही ऐकू येते. दोन-तीन अ‍ॅम्बुलन्स पाठविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याचवेळी एका जणाचा असाही आवाज येत आहे की, ‘कोई जिंदा न रहना चाहिए’, ‘सर्व जण मारले गेले. एनकाऊंटर यशस्वी झाले. आतापर्यंत मीडियाही पोहोचला नसेल. मीडियातही दम नाही,’ असाही आवाज या क्लिपमधून ऐकावयास मिळत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मुख्यमंत्र्यांनी दिले न्यायालयीन चौकशीचे आदेशभोपाळच्या तुरुंगातून सिमीचे आठ जण पळाल्याच्या आणि त्यांच्या कथित एन्काऊंटर प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की, ही चौकशी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस.के. पांडे हे करतील. सिमीचे हे कार्यकर्ते ३०-३१ च्या मध्यरात्री तुरुंगातून पळाले होते.फरार होण्यापूर्वी सिमी कार्यकर्त्यांनी येथील सुरक्षारक्षक रमाशंकर यादव यांची हत्या केली होती. ३१ आॅक्टोबर रोजी भोपाळच्या बाहेरच्या परिसरात मणिखेडा पठार येथे पोलिसांच्या एन्काऊटरमध्ये हे आठ जण मारले गेले होते.यानंतर पोलीस आणि राज्याच्या गृहमंत्र्यांचे परस्पर विरोधी वक्तव्ये आली होती. त्यामुळे ही चकमक खोटी असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. उच्च न्यायालयात याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली असून, न्यायालयीन चौकशीची मागणी यात करण्यात आली आहे.