शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'वर्क फ्रॉम होम'मुळे भारतीयांचं काम सरासरी ३२ मिनिटांनी वाढलं!

By मोरेश्वर येरम | Updated: November 29, 2020 10:57 IST

ऑस्ट्रेलियातील 'अॅटलासन' या सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनीने जगातील ६५ देशांमधील कामाचे सर्वेक्षण केले आहे. यात कर्मचारी कामाच्या वेळेच्या आधी काम सुरू करून ते उशिरापर्यंत काम करत असल्याचं आढळून आलं आहे.

ठळक मुद्दे'वर्क फ्रॉम होम'मुळे काम आणि घर यांची सरमिसळ झालीवर्क फ्रॉम होममुळे कामाच्या तासांमध्ये वाढ झाल्याचं निष्पन्नइस्राइलमध्ये कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक कामाचे तास वाढले

नवी दिल्लीघाईघाईत जेवण करणं असो किंवा मग न संपणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्स कोरोना काळात 'वर्क फ्रॉम होम'मुळे कामाच्या तासांमध्ये वाढ झाल्याचे हे पुरावे कमी वाटत असतील तर आता एक अहवाल प्रसिद्ध झालाय यातून भारतीयांच्या कामाच्या तासांत वाढ झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 

ऑस्ट्रेलियातील 'अॅटलासन' या सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनीने जगातील ६५ देशांमधील कामाचे सर्वेक्षण केले आहे. यात कर्मचारी कामाच्या वेळेच्या आधी काम सुरू करून ते उशिरापर्यंत काम करत असल्याचं आढळून आलं आहे. यात इस्राइल सर्वात आघाडीवर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्याच्या तुलनेत एप्रिल आणि मे महिन्यात इस्राइलमधील नागरिकांनी दिवसाला सरासरी ४७ मिनिटं जास्त काम केलं. तर भारतीय नागरिकांनी दररोज सरासरी ३२ मिनिटं जास्त वेळ काम केल्याचं अहवालात नमदू करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही हेच प्रमाण आहे. 

'वर्क फ्रॉम होम'मुळे लांबचा प्रवास टळला असला तरी त्याचा फायदा होतोय अशातलाही काही भाग नाही. हैदराबाद स्थित आयटी कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असलेले पुनीत श्रीवास्तव म्हणतात की, "लॉकडाउनच्या आधीच्या वर्क फ्रॉम होममध्ये एक सुसंवाद होता. त्यावेळी घरची कामं संपवून डॉक्टरकडे जाण्यासाठी किंवा मुलांच्या शाळेत जाण्यासाठी वेळ मिळत होता. पण आता मी घरी लॅपटॉपला खिळून असतो. व्हिडिओ मिटिंग्जसाठी कोणत्याही वेळी आम्हाला उपलब्ध राहावं लागतं." 

वर्क फ्रॉम होममध्ये कर्मचारी सकाळी आणि संध्याकाळी सर्वाधिक काम करत असून दुपारी सर्वात कमी काम होत असल्यांचही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. घरातून काम करण्याची मुभा असल्यानं अनेक जणांनी कामात विश्रांती घेऊन पुढे कामाच्या तासांत वाढ होण्याचं अंगवळणी पाडून घेतलं आहे. त्यामुळे घर आणि ऑफीस अशा दोन गोष्टी कर्मचाऱ्यांना वेगळ्या राखता येणं कठीण होऊन बसलं आहे. इतकंच नव्हे तर घरातील अद्याप कोणतीही जबाबदारी नसलेल्यांनाही कामातून स्वत:साठीचा वेळ काढणं कठीण झालं आहे. काहीजण कोणतीही ब्रेक न घेता सलग काम करत आहेत. कोरोना काळात कामाच्या सीमा निश्चित करणं आता कठीण होऊन बसल्याचं अनेकांचं मत आहे. तर २३ टक्के लोक काम संपल्यानंतर आपल्या वैयक्तिक वेळेतही कामाचाच विचार करत असल्याचं समोर आलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलियाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक