शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

ना वर्क फ्रॉम होम.. ना ऑनलाइन क्लास..; दिल्लीत इंटरनेट बंदीचा नाहक त्रास

By देवेश फडके | Updated: January 27, 2021 14:12 IST

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचा सामान्य नागरिकांना मोठा नाहक त्रास भोगावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंटरनेट बंदीचा सुमारे पाच कोटी नागरिकांवर थेट प्रभाव पडल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील इंटरनेट बंदीचा पाच कोटी नागरिकांवर परिणामवर्क फ्रॉम होम, ऑनलाइन क्लास, पेमेंट्सवर मोठा प्रभावकृषी कायद्याविरोधात काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर इंटरनेट बंदीचा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारानंतर दिल्ली आणि दिल्ली राजधानी क्षेत्रातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले. मात्र, ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचा सामान्य नागरिकांना मोठा नाहक त्रास भोगावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

दिल्लीत टॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर लगेचच मोबाइल इंटरनेट बंदीचे निर्देश देण्यात आले. कोरोना संकटामुळे घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच ऑनलाइन क्लास असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसल्याचे समोर येत आहे. इंटरनेट बंद असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या अनेकविध प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. 

ऑनलाइन क्लास रद्द

पश्चिम दिल्ली भागातील अनेक ठिकाणी इंटरनेट बंद असल्यामुळे ऑनलाइन क्लास रद्द करण्यात आले. केवळ घरून काम करणारे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनाच इंटरनेट बंदीचा फटका बसला असे नाही, तर यामुळे सामान्य कामकाजही विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे, तर इंटरनेट बंदीमुळे ऑनलाइन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाल्याचे समोर येत आहे. 

इंटरनेट बंदीचा पाच कोटी नागरिकांना फटका

इंटरनेट बंदीचा सुमारे पाच कोटी नागरिकांवर थेट प्रभाव पडल्याची माहिती मिळाली आहे. राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर अनेक ठिकाणचे सामान्य जनजीवनही विस्कळीत झाले आहे. यामुळे दिल्लीत गेलेल्या प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले आहेत. तसेच या प्रकरणी २०० जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच या हिंसाचारानंतर पोलिसांनी २२ एफआयआर नोंदवल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

 

टॅग्स :delhi violenceदिल्लीFarmerशेतकरीagitationआंदोलनNCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्र