शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

चिंताजनक - लढाऊ विमानांचा ताफा दशकभरातील नीचांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2016 5:09 PM

भारतीय नौदलाकडे सध्या लढाऊ विमानांच्या अवघ्या 32 तुकड्या असून ही संख्या एका दशकातील नीचांकी आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - भारतीय नौदलाकडे सध्या लढाऊ विमानांच्या अवघ्या 32 तुकड्या असून ही संख्या एका दशकातील नीचांकी आहे. एका तुकडीत किंवा स्क्वाड्रनमध्ये सुमारे 20 लढाऊ विमानं असतात. भारतीय सैन्याला देशाच्या सीमांच्य़ा रक्षणासाठी 42 तुकड्यांची गरज असताना अवघ्या 32 तुकड्या तैनात असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसत आहे.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर घातली असून लढाऊ विमानांच्या कमतरतेपोटी होत असलेल्या समस्येची चर्चा केली आहे. रशियन बनावटीच्या मिग 21 च्या तीन तुकड्या कालबाह्य झाल्यामुळे मोडीत काढल्यानंतर सध्या भारतीय हवाई दलाकडे शिल्लक असलेल्या लढाऊ विमानांच्या तुकड्यांची संख्या 32 वर आली आहे.
 
 
पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या पश्चिम व उत्तरेच्या सीमांच्या रक्षणासाठी भारताला 42 स्क्वाड्रन्सची गरज आहे. त्यातही 2020 पर्यंत सध्या ताफ्यात असलेल्या आणखी 14 तुकड्या निकामी होणार आहेत. ही कमतरता भरून काढण्यासाठी केंद्र सरकार फ्रेंच बनावटीची राफेल आणि भारतीय बनावटीची तेजस ही लढाऊ विमाने भरती करण्याच्या तयारीत आहेत, परंतु अद्याप त्यास यश आलेले नाही. 
बहारीन मधल्या एअर शोमध्ये तेजस प्रदर्शित करण्यात आले, परंतु त्यास अद्याप वापरण्यायोग्य अशी अंतिम मंजुरी मिळालेली नाही. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानाच्या सज्जतेसाठी प्रयत्न करत आहे.