शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

यंदा पूर्ण होतील सात सिंचन प्रकल्प

By admin | Published: May 12, 2016 3:56 AM

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०२० पर्यंत एकूण ९९ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात येईल. हे प्रकल्प त्वरित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) पूर्ण करण्यात येत आहेत

प्रमोद गवळी,  नवी दिल्लीपंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०२० पर्यंत एकूण ९९ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात येईल. हे प्रकल्प त्वरित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) पूर्ण करण्यात येत आहेत. त्यात महाराष्ट्रातील २६ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांचा अंदाजित खर्च ३६२९८ कोटी रुपये आहे. या २६ पैकी ७ प्रकल्प चालू वर्षातच पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती जल संसाधन राज्यमंत्री प्रा. सांवरलाल जाट यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. प्रा. जाट म्हणाले, यावर्षी महाराष्ट्रातील वाघूर (खर्च १२३३ कोटी रुपये), बावनथडी (आयएस) (७३९ कोटी), लोअर दुधना (१५५२ कोटी), तिल्लारी (६५६ कोटी), लोअर वर्धा (१९१२ कोटी), लोअर पंजारा (२९५ कोटी) आणि नांदूर मधमेश्वर, दुसरा टप्पा (२०.५० कोटी) हे सात सिंचन प्रकल्प पूर्ण केले जातील. या प्रकल्पांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.याशिवाय २०२० पर्यंत ज्या सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण केले जाणार आहे, त्यात गोसेखुर्द (एनपी) (खर्च १३३६६ कोटीे), अप्पर पैनगंगा (१५१२ कोटी), बेंबळा (३०५७ कोटी), तराळी (८१६ कोटी), धोम बालकवाडी (७५१ कोटी), अर्जुना (६४२ कोटी रुपये), अप्पर कुंडलिका (२७४ कोटी), अरुणा (५८८ कोटी), कृष्णा कोयना लिफ्ट (२३२८ कोटी), गडनदी (३७.५५ कोटी), सांगोला शाखा कालवा (८०६ कोटी), खडकपूर्णा १३४८ कोटी), वारणा (१०६३ कोटी), मोरना (गुरेघर) (१८३ कोटी), लोअर पेंदी (१०७१ कोटी), वांग प्रकल्प (१९४ कोटी), नरदेव (मोहम्मदवाडी) (२५३ कोटी) आणि कडिली (३२४ कोटी) यांचा समावेश आहे, असे प्रा. जाट यांनी सांगितले.