शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कुमारस्वामींना मिळतंय १२ वर्षांपूर्वीच्या 'कर्मा'चं फळ?; यावेळी येडियुरप्पांचं पारडं जड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 12:21 IST

येडीयुराप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी ठरविल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये भाजपाशी मतभेद झाल्याने बाहेर पडत कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती.

बंगळुरु : कर्नाटकमध्ये आज मुख्यमंत्री कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला आहे. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते येडीयुराप्पा प्रयत्नशील आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर तर त्यांनी गुढघ्याला बाशिंग बांधत मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत बहुमत सिद्ध न करता आल्याने पायउतार व्हावे लागले. आजच्या घडामोडी पाहून येडीयुराप्पा 12 वर्षांपूर्वीचा बदला तर घेत नाहीत ना, असा प्रश्न निर्माण होतो. 

जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी आणि भाजपाचे नेते बी एस येडीयुराप्पा यांच्यातील वैर काही नवे नाही. येडीयुराप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी ठरविल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये भाजपाशी मतभेद झाल्याने बाहेर पडत कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती. मात्र, या पक्षाला विधानसभा आणि लोकसभेत अपयश आल्याने पुन्हा त्यांनी 2013 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. यानंतर 2014 मध्ये ते  भाजपाचे खासदार झाले होते. तर खासदार पुत्राला आमदार केले होते. 

कुमारस्वामी आणि येडीयुराप्पा यांच्यातील वादाची पार्श्वभूमी ही 2007 मधील आहे. तेव्हा कर्नाटकमध्ये जेडीएस-भाजपाचे सरकार होते. त्यांच्यातील समझोत्यानुसार पहिली 2.5 वर्षे कुमारस्वामी आणि त्यानंतरची 2.5 वर्षे येडीयुराप्पा मुख्यमंत्री होतील असे ठरले होते. मात्र, जेव्हा कुमारस्वामींच्या मुख्यमंत्री पदाला 20 महिने पूर्ण झाले तेव्हा ऑक्टोबर 2007 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार दिला होता. यामुळे भाजपाने आणि त्यांच्या मंत्र्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या वादानंतर पुन्हा दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आणि 12 नोव्हेंबरला येडीयुराप्पा मुख्यमंत्री झाले. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. 

नोव्हेंबरमध्ये येडीयुराप्पांनी मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यांनी कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, जेडीएसच्या वाट्याला कमी महत्वाची मंत्रिपदे आल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडली. यामुळे कुमारस्वामींनी येडीयुराप्पा सरकारचा पाठिंबाच काढून घेतला. कुमारस्वामींच्या काळात येडीयुराप्पा उप मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. मात्र, येडीयुराप्पा मुख्यमंत्री बनल्यानंतर जेडीएसला मंत्रिमंडळात दुय्यम पदे देण्याचे घाटले आणि येडीयुराप्पांना अवघ्या 7 दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

यानंतर झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमत मिळाले आणि येडियुराप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र, अवघ्या 7 दिवसांत राजीनामा द्यावा लागल्याचे शल्य येडीयुराप्पांना सतावत होते. त्यातच पुन्हा 2018 च्या निवडणुकीवेळी अवघ्या 2 दिवसांत राजीनामा द्यावा लागल्याने आणि त्याचेही कनेक्शन कुमारस्वामींशीच जुळल्याने येडीयुराप्पा बदला तर घेत नाहीयेत ना अशी शंका निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)