शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

होय, मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात चीनने घुसखोरी केली होती, पण... चिदंबरम यांचे नड्डांना प्रत्युत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 15:52 IST

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेले आरोप खोडून काढत उलट त्यांच्यावरच प्रत्यारोप केल्यानंतर आता ड़ॉ. सिंग यांच्या बचावासाठी काँग्रेसच्या कार्यकाळात गृहमंत्री असलेले पी. चिदंबरम पुढे आले आहेत.

ठळक मुद्दे तेव्हा चीनकडून घुसखोरी झाली होती मात्र त्यावेळी चीनने कुठल्याही भारतीय भूभागावर कब्जा केला नव्हतातसेच हिंसक झटापटीत भारतीय जवानांचा मृत्यू झाला नव्हता

नवी दिल्ली - लडाखमधील चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले आरोपप्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेले आरोप खोडून काढत उलट त्यांच्यावरच प्रत्यारोप केल्यानंतर आता ड़ॉ. सिंग यांच्या बचावासाठी काँग्रेसच्या कार्यकाळात गृहमंत्री असलेले पी. चिदंबरम पुढे आले आहेत. पी. चिदंबरम यांनी ट्वविटरवरून मोर्चा सांभाळत नड्डांवर निशाणा साधला आहे.

 या ट्विटमध्ये चिदंबरम म्हणतात, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे २०१० ते २०१३ या काळात भारतामध्येचीनकडून ६०० वेळा झालेल्या घुसखोरीचे स्पष्टीकरण मागितले आहे. हो तेव्हा चीनकडून घुसखोरी झाली होती. मात्र त्यावेळी चीनने कुठल्याही भारतीय भूभागावर कब्जा केला नव्हता. तसेच हिंसक झटापटीत भारतीय जवानांचा मृत्यू झाला नव्हता, असा टोली चिदंबरम यांनी लगावला.  

लडाखमधील गलवान खोऱ्यात गेल्या सोमवारी चिनी सैनिक आणि भारताच्या जवानांमध्ये हिंसक झटापट झाली होती. त्यामध्ये एका कर्नलसह २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे सुमारे ४५ सैनिक मृत्युमुखी पडले होते. चिनी सैनिकांनी भारतीय सीमेच्या बाजूने लावलेले तंबू हटवण्यासाठी भारतीय जवान गेले असताना ही झटापट झाली होती. दरम्यान, ६ जून रोजी लेफ्टनेंट जनरल रँकच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हे तंबू हटवण्याची हमी चीनने दिली होती. मात्र नंतर चीनने दगाबाजी करत येथील तंबू कायम ठेवले होते.  

दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे चीनच्या हद्दीत येणाऱ्या मोल्डो भागात ही बैठक पार पडली. तब्बल १२ तास चाललेल्या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. सीमेवरून सैन्य मागे घेण्यास चीन तयार आहे. त्यामुळे भारतही आपले जवान मागे घेईल, असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

"आमची बांधिलकी जनतेशी, ती मातोश्री ते सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही"

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीनP. Chidambaramपी. चिदंबरमManmohan Singhमनमोहन सिंगBJPभाजपा