शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

होय...आमच्या लष्कराचा कारगिल युद्धात सहभाग होता; पाकिस्तानची प्रथमच कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 09:26 IST

पाक लष्करप्रमुख जन. असीम मुनीर यांचाच कबुलीनामा, भारताच्या सत्यकथनावर शिक्कामोर्तब

इस्लामाबाद : १९९९च्या कारगिल गेले. युद्धामध्ये पाकिस्तान सहभागी होता याची पाकिस्तानच्या लष्कराने जन. असीम मुनीर पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली आहे. पाकिस्तानच्या संरक्षण दिनानिमित्त रावळपिंडी येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी स्वतः ही कबुली दिली. १९४८, १९६५, १९७१ तसेच १९९९मधील कारगिलच्या युद्धात अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला, असेही जनरल मुनीर यांनी कबुल केले.

कारगिल भागात घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने त्यातील अनेकांचे मृतदेह पाकिस्तानने ताब्यात घेतले नव्हते. त्यामुळे भारतीय लष्करानेच या सैनिकांच्या मृतदेहांवर अंतिम संस्कार केले होते. पाकिस्तानने आपल्या काही सैनिकांचे मृतदेह जाहीरपणे नव्हे तर लपूनछपून ताब्यात घेतल्याच्या बातम्या कारगिल युद्धानंतर झळकल्या होत्या. कारगिल युद्धात आमचा सहभाग नव्हता अशीच भूमिका आजवर पाकिस्तानी लष्कराने घेतली होती. मात्र आता जनरल मुनीर यांनी पाकिस्तानच्या कारगिल युद्ध सहभागाची कबुली दिल्याने भारत यासंदर्भात सत्य सांगत होता हे सिद्ध झाले आहे. नियंत्रण रेषेनजीक भारतीय हद्दीत ज्या चौक्यांवर पाकिस्तानने कब्जा केला होता.

सैन्य माघारीची क्लिंटन यांची पाकला सूचना

कारगिल येथून आपले लष्कर माघारी बोलविण्याचा आदेश पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी द्यावा, अशी सूचना अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लेिटन यांनी केली होती. तीन महिने चाललेल्या कारगिल युद्धात भारताचे ५४५ जवान शहीद झाले होते.

पाकिस्तानविरुद्ध भारताने दिले पुरावे

कारगिल युद्धात पाकिस्तानचे लष्कर सहभागी असल्याचे अनेक पुरावे भारताने दिले होते. पाकिस्तानी सैनिकांची पेबुक, त्यांचे गणवेश, शस्त्रे यांचा त्यात समावेश होता. मात्र भारताने सादर केलेले पुरावे खोटे आहेत असाच कांगावा पाकिस्तान करत राहिला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन