शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
2
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
3
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
4
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
5
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
6
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
7
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
8
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
9
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
10
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
11
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
12
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
13
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
14
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
15
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
16
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
17
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
18
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
19
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
20
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

लोकशाहीला कमजोर करणारे सत्याग्रह नाही करु शकत; सीएम योगींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 3:27 PM

'परदेशात जाऊन आपल्याच देशावर टीका करणारा, प्रश्न उपस्थित करणारा सत्याग्रहाबद्दल बोलत आहे.'

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेसच्या राजघाटावरील सत्याग्रह आंदोलनावर टीका करताना ते म्हणाले की, "जे लोक लोकशाही कमकुवत करतात ते सत्याग्रह करू शकत नाहीत. भाषावाद आणि प्रादेशिकवादाच्या आधारे देशाचे विभाजन करणारेही सत्याग्रह करू शकत नाहीत. ज्यांना माणसांबद्दल सहानुभूती नाही, त्यांना सत्याग्रहाचा अधिकार नाही.' रविवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना योगींनी ही टीका केली.

संबंधित बातमी- 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या

मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले, 'गांधीजींनी आपल्या जीवनात सत्य, अहिंसेला सर्वाधिक स्थान दिले. या गोष्टीसाठी त्यांनी फक्त विनंती केली. त्यांच्या विनंतीला सत्याग्रह म्हणतात. अनेकांना देशावर राज्य करण्याची संधी मिळाली, पण ज्यांना माणसांबद्दल भावना नाही, ते सत्याग्रह कसा करतील? असत्याच्या मार्गावर चालणारा सत्याग्रहाबद्दल बोलू शकत नाही. प्रचंड भ्रष्टाचारात बुडलेले लोक सत्याग्रह करू शकत नाहीत,' अशी टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाची माहिती देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'सत्याग्रह म्हणजे मन, शब्द आणि कृती. ज्यांचे आचार-विचार, शब्द आणि कृती भिन्न आहेत, ते सत्याग्रह करू शकत नाही. परदेशात जाऊन आपल्याच देशावर टीका करणारा, आपल्याच देशावर प्रश्न उपस्थित करणारा आणि आणि ज्याच्या मनात देशाच्या शूर सैनिकांबद्दल आदर नाही, तो सत्याग्रहाबद्दल बोलत असेल, तर ही मोठी विडंबना आहे,' असंही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा