शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

Lakhimpur Kheri Violence: Yogendra Yadav शेतकरी आंदोलनातून महिनाभरासाठी निलंबित, लखीमपूरमध्ये मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेल्याने कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 09:57 IST

Yogendra Yadav suspended: Samyukt Kisan Morchaचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते Yogendra Yadav यांनी लखीमपूर-खेरी हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) मारल्या गेलेल्या BJP कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने ४६ शेतकरी संघटनांच्या समुहाने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते योगेंद्र यादव यांना आंदोलनातून महिनाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी लखीमपूर-खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने ४६ शेतकरी संघटनांच्या समुहाने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केली आहे. लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकरी, एक पत्रकार, दोन भाजपा कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरचा समावेश होता.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पंजाबमधील शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीनंतर योगेंद्र यादव यांच्याविरोधात हा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. निलंबनाच्या कालावधीत योगेंद्र यादव शेतकऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. याबाबत यादव यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, यादव यांनी गेल्या आठवड्यात भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. कारण त्यांची भेट घेतली पाहिजे, असे त्यांना वाटले होते. लखीमपूर-खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे आरोप केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर झाले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली होती.

भारतीय किसान युनियन दोआबाचे अध्यक्ष मंजित सिंग राय यांनी सांगितले की, या प्रकरणी ३२ शेतकरी संघटनांचे एकमत होते. तसेच संघटनांकडून यादव यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, यादव हे भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटण्यास गेल्याने दु:खी नव्हते. मात्र याबाबत आधी शेतकरी संघटनांना कल्पना न दिल्याने माफी मागण्यास तयार आहेत.

हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर पाच दिवसांनी आशिष मिश्रा याला अटक झाली होती. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा एसयूव्हीमध्ये दिसलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच यामध्ये सुमित जयस्वाल याचाही समावेश आहे. तो व्हायरल व्हिडीओमध्ये पळून जाताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून झालेल्या दगडफेकीमुळे गाडीवरचे नियंत्रण सुटले, अशा प्रकारची तक्रार त्याने पोलिसांकडे केली होती. शेतकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत ड्रायव्हर, मित्र आणि भाजपाचे दोन कार्यकर्ते मारले गेल्याचे त्याने म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmers Protestशेतकरी आंदोलन