शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शेतकरी आंदोलन: योगी सरकार अ‍ॅक्शनमध्ये!; आंदोलन स्थळं रिकामी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 18:11 IST

येथे जवळपास 1200 शेतकरी उपस्थित आहेत. यूपीमध्ये सध्या दिल्ली यूपी बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे.

लखनौ :दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकार आता अ‍ॅक्शनच्या तयारीत आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, ती ठिकाणे रिकामी करा, असा आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. एवढेच नाही, तर शेतकरी जेथे आंदोलन करत आहेत, त्यांनी आजच ती ठिकाणं सोडावीत. त्या सर्वांना घरी जाण्यासाठी सरकार मोफेत सुविधा देईल, असेही सरकारने म्हटले आहे. 

यासाठी गाझीपूर सीमेवर बसेरदेखील पोहोचल्या आहेत. सध्या येथे जवळपास 1200 शेतकरी उपस्थित आहेत. यूपीमध्ये सध्या दिल्ली यूपी बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे. तसेच मथुरा आणि आग्र्यात सुरू असेलेली आंदोलनं संपली आहेत. बरेली, बागपत, नोएडा आणि बुलंदशहरातीलही आंदोलनं संपुष्टात आली आहेत.यूपी गेटवर अद्यापही काही लोक -उत्तर प्रदेशचे एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी सांगितले की, 26 जानेवारीला झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर काही शेतकरी संघटनांनी स्वेच्छेने चिल्ला बॉर्डर आणि दलित प्रेरणा स्थळावरून आंदोलन मागे घेतले. बागपत येथे लोकांना समजावल्यानंतर त्यांनीही रात्री आपले आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, यूपी गेटवर अद्यापही काही लोक आहेत. पण, त्यांची संख्या अत्यंत कमी आहे.राजधानी दिल्लीत 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलक शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी हिंसाचार करण्यात आला. यानंतर आता या आंदोलनाशी संबंधित शेतकरी संघटना स्वतःच आंदोलन संपवत असल्याच्या घोषणा करत आहेत.

दिल्ली पोलीसही अ‍ॅक्शन मोडमध्ये -ट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांची धरपकड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन न केल्यानं तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा सवाल पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेत्यांना ३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाdelhi violenceदिल्ली