शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता बनवणारी हिंदू युवा वाहिनी मोजतेय अखेरच्या घटका, अनेक पदाधिकारी सपामध्ये दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:02 IST

Hindu Yuva Vahini News: Yogi Adityanath यांनी उत्तर प्रदेशच्या राजकाणार मोठी झेप घेतली आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून घडवणारी हिंदू युवा वाहिनी ही संघटना मात्र अखेरच्या घटका मोजत आहे.

गोरखपूर - उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना भाजपाने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या राजकाणार मोठी झेप घेतली आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून घडवणारी हिंदू युवा वाहिनी ही संघटना मात्र अखेरच्या घटका मोजत आहे. तसेच या संघटनेतील बहुतांश पदाधिकारी हे समाजवादी पक्षात गेले आहेत. तर या संघटनेकडे लक्ष देणारा कुणीही उरलेला नाही. योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनीची स्थापना २००२ मध्ये केली होती. राष्ट्रविरोधी कृत्यांना रोखणे हे या संघटनेचे उद्दीष्ट होते. २००७ मध्ये योगी आदित्यनाथ यांना ११ दिवस तुरुंगातही राहावे लागले होते. हिंदू युवा वाहिनीचे वर्चस्व आहे.

हिंदू युवा वाहिनीचे अध्यक्ष असलेल्या सुनील सिंह आणि त्यांच्यासोबत सौरभ विश्वकर्मा, चंदन विश्वकर्मा यांनी १५ वर्षांपर्यंत हिंदुत्वाचा झेंडा हिंदू युवा वाहिनीने उचलून धरला होता. मात्र २०१७च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटपादरम्यान त्यांचे योगी आदित्यनाथ यांच्याशी मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांनी संघटनेच्या बाहेर काढले होते. आता हे तिन्ही नेते समाजवादी पक्षात दाखल झाले आहेत.

हिंदू युवा वाहिनीच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ हे सीएम बनल्यानंतर हिंदू युवा वाहिनीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले. हळुहळू जिल्हा कार्यकारिणी भंग करण्यात आली. त्यामुळे सर्व कार्यकर्ते हे समाजवादी पक्षात जाऊ लागले. या क्रमामध्ये २०१८ मध्ये उत्तर प्रदेशमधील बलरामपूर, मऊ, आझमगड या जिल्ह्यांमधील कार्यकारिणी भंग करण्यात आल्या. या भागांमध्ये या संघटनेची भक्कम जाळे होते.  

 आरएसएसच्या आदेशांनुसार हिंदू युवा वाहिनीला भंग करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यापासून या संस्थेच्या विस्ताराला ब्रेक लागला होता. तसेच समांतर हिंदुत्ववादी संघटना भविष्यात पक्षासाठी डोकेदुखी ठरली असती, त्यामुळे ही संघटना आटोपती घेण्यात आल्याची चर्चा आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाGorakhpurगोरखपूरHindutvaहिंदुत्व