शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
5
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
6
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
7
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
8
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
9
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
10
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
11
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
12
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
13
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
14
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
15
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
16
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
17
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
18
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
19
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
20
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका

“अखिलेश यादव आणि राहुल गांधींमध्ये जास्त फरक नाही”; योगी आदित्यनाथांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 15:29 IST

विरोधी पक्षनेत्याने गोमातेची सेवा केली असती, तर गोमातेच्या कल्याणाची भाषा ते बोलले असती, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला.

लखनऊ: दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. तसेच विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचारही घेतला. यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात जास्त फरक नसल्याचा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला. 

राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यातील एक महत्त्वाचा फरक म्हणजे राहुल गांधी देशाबद्दल वाईट बोलतात आणि अखिलेश यादव प्रदेशाबद्दल, अशी टीकाही योगी आदित्यनाथ यांनी केली. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात बोलताना, एकदा एका शाळेत गेलो होतो. तेव्हा तेथील मुलांना विचारले की, तुम्ही मला ओळखता का, या प्रश्नावर मुलांनी होकारार्थी मान डोलावून तुम्ही राहुल गांधी आहात, असे म्हटले, असा मजेशीर किस्सा अखिलेश यादव यांनी सभागृहात सांगितला. यानंतर सर्व सदस्य मनमोकळेपणाने हसले. हाच धागा पकडून योगी आदित्यनाथ यांनी टोलेबाजी केली. 

लहान मुले भोळी-भाबडी असतात, ते नेहमी खरे बोलतात

यावर बोलताना लहान मुले भोळी-भाबडी असतात. मुले नेहमी सत्यकथन करतात, खरे बोलतात. त्यांनी विचारपूर्वकच उत्तर दिले असणार. तसे पाहता तुमच्यात आणि राहुल गांधींमध्ये फार जास्त फरक नाही. ते देशाबद्दल वाईट बोलतात आणि तुम्ही प्रदेशाबद्दल, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी टोला लगावला. अखिलेश यादव यांच्या गोमयाबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आताच्या काळात गोमयापासून अगरबत्तीही बनवल्या जात आहेत. मला वाटले की, जर तुम्ही घरी पूजा करत असता, तर तुम्ही अगरबत्ती लावत असाल. मला वाटते की, विरोधी पक्षनेत्याने गोमातेची सेवा केली असती, तर ते गोमातेच्या कल्याणाची भाषा बोलले असती, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला. 

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून चालवणाऱ्या जाणाऱ्या योजनांवर चर्चा झाली. विरोधी पक्षाचे नेते म्हणतात की, हा समाजवाद आहे. मात्र, यानिमित्ताने का होईना, विरोधकांनी पंतप्रधानांच्या गरीब कल्याण कार्यक्रमाचे कौतुक केले, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवRahul Gandhiराहुल गांधी