शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Yogi Adityanath: योगी सरकार 2 चं गरिबांसाठी पहिलं गिफ्ट, मार्चनंतरही 'ती' योजना सुरुच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 22:30 IST

अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूकांपूर्वीच राज्यातील गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली होती

लखनौ - प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना 4 मार्चनंतरही सुरूच राहणार असल्याची घोषणा अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. त्यानंतर, कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला(PM Garib Kalyan Anna Yojana) मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाली. मात्र, आता उत्तर प्रदेशात ही योजना आणखी पुढे चालूच राहणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. 

अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूकांपूर्वीच राज्यातील गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली होती. पंतप्रधान गरिब कल्याण योजनेंतर्गत देशातील जनतेला नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्यात आले होते. योगी आदित्यनाथ यांनी मार्च महिन्यापर्यंत ही योजना सुरूच ठेवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशमध्ये घेतला आहे. त्यानंतर, केंद्र सरकारनेही ही योजना मार्च महिन्यापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळत आहे. 

मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश कोरोना महामारीमुळे निर्माण होणारा ताण कमी करणे हा आहे. आता, भाजपला 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालं असून युपीतही स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळेच, गरिबांसाठीची ही योजना यापुढेही उत्तर प्रदेशात सुरू राहणार आहे. लवकरच सरकार स्थापन होणार असून पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आहे. यासंदर्भात हिंदुस्तान टाईम्सने उत्तर दिलंय. 

योजनेचा लाभ कोणाला आणि किती मिळतो?

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत, भारतातील सुमारे 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना दरमहा 5 किलो अधिक धान्य(गहू-तांदूळ) दिले जाते. देशातील ज्या नागरिकाकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे, त्यांना या योजनेअंतर्गत दरमहा 5 किलो अतिरिक्त रेशन त्याच्या कोट्यातील रेशनसह मिळत आहे. पण, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

योजनेचा लाभ न मिळाल्यास तक्रार करू शकता

जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि रेशन विक्रेते या योजनेअंतर्गत तुमच्या कोट्यात धान्य देण्यास नकार देत असतील तर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल वर प्रत्येक राज्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यावर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही NFSA वेबसाइट https://nfsa.gov.in वर जाऊन मेल लिहून तक्रार नोंदवू शकता.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश