शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

निम्मीच मते पडली, आता पाणीही तेवढेच मिळणार; भाजपा नेत्यांची महिलांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 14:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी व्हायब्रंट गुसरातचा नारा दिला होता. तसेच गुजरात कसे अग्रेसर आहे, गुजरातचा विकास याबाबत सांगत लोकांची मते जिंकली होती.

बडोदा : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान होण्यासाठी भाजपाच्या मंत्र्यांकडून मतदारांना धमकावण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. केंद्रीय मंत्री मेनका गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आता भाजपाच्याचगुजरातच्या मंत्र्याचे नाव या यादीमध्ये आले आहे. पाण्याचा प्रश्न घेऊन गेलेल्या महिलांना या मंत्र्याने मला तुम्ही 55 टक्केच मते दिली, पाणी तेवढेच मिळणार असे वक्तव्य केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी व्हायब्रंट गुसरातचा नारा दिला होता. तसेच गुजरात कसे अग्रेसर आहे, गुजरातचा विकास याबाबत सांगत लोकांची मते जिंकली होती. मात्र, यानंतर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पाटीदार आंदोलन आणि अन्य प्रश्नांवर कांग्रेसने चांगलीच लढत दिली होती. गुजरातवर भाजपाचा निसटता विजय झाला असला तरीही त्याची सल तेथील नेत्यांमध्ये असल्याचे दिसत आहे. भाजपाचे पाणी पुरवठा मंत्री कुंवरजी बावलिया हे त्यांच्या मतदारसंघात फिरत असताना तेथील महिलांनी आपल्याला पाणी मिळत नसल्याची तक्रार केली. यावर मला विधानसभेसाठी विनंती करूनही 55 टक्केच मते दिलीत, असे प्रत्यूत्तर दिले. यावर भाजपाचे माजी आमदार भरत बोघारा यांनी पुढे बोलत 'आता तुम्हाला तेवढेच पाणी मिळेल', अशी धमकी दिली. 

गुजरातच्या मंत्र्यांचा याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गेल्या आठवड्यात भाजपाच्या केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी मुस्लिमांना मतदान करण्यासाठी धमकावले होते. तर रविवारी एका सभेमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बेरोजगार तरुणांना उद्देशून बॅनर खाली करा नाहीतर आयुष्यभर बेरोजगार रहाल, अशी धमकी दिली होती. त्या आधी भाजपाचेच खासदार साक्षी महाराज यांनी मतदान न केल्यास साधूचा शाप लागेल, अशी धमकी उपस्थितांना दिली होती. 

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरातGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019