शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:17 IST

माईक बंद झाल्यानंतर राहुल गांधींना भाजपवर निशाणा साधला.

Rahul Gandhi : संविधान दिनाचे औचित्य साधून दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेसने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी दलित आणि जात जनगणनेबाबत बोलत होते. यावेळी अचानक लाईट गेल्यामुळे त्यांचे माईक बंद पकडले. काही वेळानंतर लाईट आल्यावर राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. 'तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी, माईक बंद केला, तरी मला गप्प करू शकणार नाहीत. मला जे बोलायचे आहे, ते मी बोलेन. नरेंद्र मोदीजींनी संविधान वाचले असते, तर असे वागले नसते,' अशी टीका राहुल गांधींनी केली. 

'संविधान हा सत्य आणि अहिंसेचा ग्रंथ आहे. संविधान हिंसाचाराला परवानगी देत ​​नाही. यामध्ये आंबेडकर, फुले, विवेकानंद, बुद्ध इत्यादी महान विचारवंतांची विचारसरणी पाहायला मिळते. हिंसा करावी, असे त्यात लिहिले आहे का? कोणालाही घाबरवायचे आणि अहिंसेचा मार्ग दाखवायचा, हे भारताचे सत्य आहे का? काही दिवसांपूर्वीच तेलंगणामध्ये जातीगणनेचे काम सुरू झाले. प्रथमच जातिसंवेदनांचा सार्वजनिक प्रयोग करण्यात आला. त्यात लाखो दलित आणि सर्व मागासवर्गीय लोक सहभागी झाले होते. येत्या काळात जिथे जिथे आपले सरकार येईल तिथे जात जनगणना करू,' असा दावाही राहुल गांधींनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले, 'तुम्हाला कुठेही कंपन्यांचे मालक दलित किंवा ओबीसी सापडणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच संविधान वाचले नाही, हे मी गॅरंटीने सांगतो. भारताची हजारो वर्षांची विचारधारा अन् शाहू, फुले, आंबेडकर आणि भगवान बुद्धांच्या 21व्या शतकातील सामाजिक सक्षमीकरणाचे सत्य यात आहे. तुम्ही कोणत्याही राज्यात जा...केरळमध्ये नारायण गुरुजी, कर्नाटकात बसवण्णा, महाराष्ट्रात शिवाजी महाराज...प्रत्येक राज्यातील महापुरुषांचे विचार यात सापडतील.'

'यात कठे सावरकरांचा आवाज दिसतो का? यात कुठे हिंसेचा वापर करावा, असे लिहिले आहे का? माणसाला मारावे, घाबरावे...असे कुठे लिहिले आहे का? हे सत्य आणि अहिंसेचे पुस्तक आहे. हे भारताचे सत्य आहे आणि ते अहिंसेचा मार्ग दाखवते. आज भारताच्या लोकसंख्येपैकी 15 टक्के दलित, 8 टक्के आदिवासी, 15 टक्के अल्पसंख्याक आहेत. पण मागासवर्गीय लोकांची संख्या किती आहे? कोणालाच माहीत नाही.'

'देशात मागासवर्गीयांची संख्या 50 टक्के असल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर काहीजण वेगवेगळी आकडेवारी देतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी आकडेवारी नोंदवली जाते. आपण 50 टक्के मागासवर्गीय, 15 टक्के दलित, सुमारे 8 टक्के आदिवासी आणि 15 टक्के अल्पसंख्याकांचा समावेश केला, तर देशातील जवळपास 90 टक्के लोकसंख्या मागासवर्गीय आहे. भारतात दररोज आदिवासी, दलित आणि मागासवर्गीय तरुण इंजिनिअर, डॉक्टर, वकील, आयएएस होण्याचे स्वप्न पाहतो. पण देशाची संपूर्ण व्यवस्था मागासलेले लोक, दलित आणि आदिवासी यांच्या विरोधात उभी आहे. तसे नसते तर देशातील 200 मोठ्या कंपन्यांच्या मालकांच्या यादीत दलित लोक सापडले असते. ज्या राज्यात आमचे सरकार येईल, तिथे आम्ही जात जनगणना करू,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी