शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

तरुण मतदारांना हवे केजरीवालांसारखे नेतृत्व

By admin | Published: April 03, 2016 3:52 AM

आसाममधील तरुण मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या बदलाची अपेक्षा करीत असून आपल्या राज्यासाठी त्यांना सर्वंकष विकास आणि सर्व धर्मांच्या कल्याणासाठी काम करणारे

तेलपूर (आसाम) : आसाममधील तरुण मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या बदलाची अपेक्षा करीत असून आपल्या राज्यासाठी त्यांना सर्वंकष विकास आणि सर्व धर्मांच्या कल्याणासाठी काम करणारे शेजारील त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेतृत्व हवे आहे. राज्यातील युवा मतदार आणि प्रामुख्याने प्रथमच मतदानाचा अधिकार बजावण्यास आतुर असलेल्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तेजपूर विद्यापीठात शिकणारी उद्दीपना गोस्वामी म्हणाली, आम्हाला बदल हवा आहे हे निश्चित; परंतु तो चांगला असावा. भाजप अशा बदलाचा दावा करीत असला तरी अलीकडच्या काळातील काही घटनांमुळे चिंता वाढली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवेश, प्रादेशिकवादावर राष्ट्रवाद थोपणे आणि सांप्रदायिक भेदभाव निर्माण होण्याच्या भीतीमुळे विद्यार्थी सतर्क झाले आहेत, असाही दावा तिने केला, तर भाजपचा प्रचार केवळ तरुण गोगोर्इंविरुद्ध असून आपल्या योजना काय आहेत हे मात्र या पक्षाने स्पष्ट केले नसल्याचे मत सुकन्या मजुमदारने मांडले. दरांग महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या हिमांका फुकन याने सांगितले की, भाजप सत्तेत आल्यास धोका निर्माण होऊ शकतो; पण आम्ही हा धोका पत्करण्यास तयार आहोत, कारण आम्हाला बदल पाहिजे आहे. फुकनची वर्गमैत्रीण मयुरी बोरा ही मात्र त्याच्या मताशी सहमत नाही. काँग्रेसच्या तीन वर्षांच्या शासनकाळात आसाममध्ये काहीच विकास झाला नाही असे म्हणणे चुकीचे आहे; पण बदलत्या काळासोबत लोकांना गतिमान विकास अपेक्षित आहे, असे ती म्हणाली.