शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केल आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
4
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
5
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
6
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
7
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
8
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
10
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
11
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
12
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
13
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
14
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
15
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
17
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
18
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
19
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

बैलांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, न्यायालयाने सरकार आणि पंचायत समितीला ठोठावला ३३ लाखांचा दंड! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:06 IST

खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने ग्रामपंचायत केसरदेसर जाटान आणि राजस्थान सरकारला दोषी ठरवले आहे. 

राजस्थानमधील बिकानेरमध्ये बैलांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. आसाराम असे या तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यूसाठी न्यायालयाने सरकार आणि पंचायत समितीला जबाबदार धरले आहे. बिकानेर जिल्हा न्यायालयाचे पीठासीन अधिकारी अतुल कुमार सक्सेना यांनी आसारामच्या मृत्यूसाठी पंचायत समिती आणि राज्य सरकारला जबाबदार धरत ३३.२५ लाख रुपये दंड ठोठावला आहे. 

दोन बैलांच्या हल्ल्यात आसारामचा मृत्यू झाला. आसाराम हा बिकानेरमधील केसरदेसर जाटान गावचा रहिवासी होता. मृत्यूच्या घटनेनंतर आसारामचे नातेवाईक नुकसान भरपाईसाठी न्यायालयात गेले होते. दरम्यान, या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने ग्रामपंचायत केसरदेसर जाटान आणि राजस्थान सरकारला दोषी ठरवले आहे. 

सामान्य नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि भटक्या प्राण्यांसाठी व्यवस्था करणे, ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. जनावरांना गोशाळांमध्ये ठेवा किंवा सामान्य लोकांच्या संरक्षणासाठी सरकारी योजनांमध्ये व्यवस्था करा. मात्र, तुम्ही हे करू शकला नाही. त्यामुळे आसारामला आपला जीव गमवावा लागला, असे न्यायालयाने म्हटले आहे.

याचबरोबर, पंचायत समिती आणि राज्य सरकार यांना मृताच्या वारसांना संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे ३३.२५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. न्यायालयाने मृताची भरपाई म्हणून ३२ लाख ५२ हजार ६०० रुपये, जीवनसाथी भरपाई म्हणून ४० हजार रुपये, अंतिम संस्कारांसाठी १५ हजार रुपये आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी १५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCourtन्यायालय