शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

घोषणा अन् अवहेलना; महाराष्ट्र भवनसाठी १०० कोटी तरतूद पण एक वीटही रचली नाही

By नारायण जाधव | Published: December 05, 2022 7:25 AM

आधी नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन बांधा, नंतर युपीतील महाराष्ट्र सदन किंवा आसाममधील महाराष्ट्र भवनाचे बघा, असा सूर आता उमटत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच केलेल्या आसाम दौऱ्यात नवी मुंबईत आसाम भवन, तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण, नवी मुंबईत वाशी रेल्वे स्टेशनसमोर यापूर्वीच आसाम भवन उभे आहे, तर महाराष्ट्र भवन मात्र घोषणांच्या गर्तेत गटांगळ्या खात आहे. 

नवी मुंबई शहराची उभारणी करताना या शहराच्या जन्मदात्या सिडकोने देशातील विविध प्रांतातील लोक येथे यावेत, या उद्देशाने १९९२ मध्ये वाशी येथील सेक्टर-३० मध्ये विविध राज्यांच्या सरकारांना त्यांच्या राज्य अतिथिगृहांसाठी भूखंड वाटपाचे धोरण तयार केले होते. त्यानुसार आतापर्यंत आसाम, गुजरात, कर्नाटक, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, मिझोराम, मेघालय, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या राज्यांना भूखंडांचे वाटप केले आहे. यात आसाम सरकारने सर्वांत आधी २००७ मध्ये आपले राज्य अतिथी भवन उभे केले आहे. सध्या याठिकाणी आसाममधील विविध रुग्ण, अतिथी राहण्यास असतात. शिवाय येथील हॉल विविध कार्यक्रम, एक्झिबिशनसाठी देण्यात येतो. 

सिक्कीम आणि त्रिपुरा सरकारच्या विनंतीनुसार खारघर सेक्टर-१६ मधील भूखंड क्र. १९ आणि २० आणि भूखंड क्र. १८ अनुक्रमे सिक्कीम आणि त्रिपुरा सरकारच्या राज्य अतिथिगृह/ विक्रयालयाच्या उभारणीसाठी देण्याचे निश्चित केले आहे. त्याचवेळी वाशीत दिलेल्या भूखंडावर महाराष्ट्र शासनाने १९९८ पासून आजपर्यंत महाराष्ट्र भवनाची वीट रचलेली नाही. मागे तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही अयोध्या दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन बांधण्याचा मनोदय व्यक्त केला होता. यामुळे आधी नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन बांधा, नंतर युपीतील महाराष्ट्र सदन किंवा आसाममधील महाराष्ट्र भवनाचे बघा, असा सूर आता उमटत आहे. कारण सिडकोने महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी वाशीत १९९८ मध्ये आठ हजार चौरस मीटरचा भूखंड राखीव ठेवला आहे. मात्र, येथे आजतागायत साधा पायाही खणला गेलेला नाही. देशातील राज्यांनी आपली स्वतंत्र ओळख सांगण्यासाठी वाशी रेल्वे स्थानक परिसरात विविध देखणे अतिथिगृह उभारले आहेत. मात्र, महाराष्ट्र भवन काही होईना. 

महाराष्ट्र भवनाला दिलेल्या १०० कोटींचे काय?मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येईल. यासाठी १०० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीवरून केली होती. परंतु, पुढे संबंधित विभागाने काहीच हालचाल केलेली नाही.