शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

१२ गावे आणि २८ वाड्यांतील आदिवासींना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2016 2:43 AM

अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रायगड जिल्ह्यातील आदिवासींच्या हक्काच्या दळी जमीन व सामूहिक जमीन दाव्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी

अलिबाग : अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रायगड जिल्ह्यातील आदिवासींच्या हक्काच्या दळी जमीन व सामूहिक जमीन दाव्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पेण तालुक्यातील बरडावाडी येथे दौरा केला. त्यानंतर शासकीय यंत्रणेने प्रभावी काम केल्याने पाबळ खोऱ्यातील १२ गावे २८ वाड्यांना न्याय मिळाला आहे, असे प्रतिपादन जांबोशी येथे आयोजित मेळाव्यात, आदिवासी क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते व साकव स्वयंसेवी संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांनी केले आहे.साकव स्वयंसेवी संस्था, आदिवासी विकास मंच व कुणबी समाजोन्नती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात पेणचे आमदार धैर्यशील पाटील व पेण तालुक्याच्या तहसीलदार सुकेशिनी पगारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना वनजमीन व हक्काचे दस्त प्रदान करण्यात आले. त्यावेळी शिवकर बोलत होते. वनामध्ये शेकडो वर्षे वास्तव्य करून वन उपजावर उपजीविका करणाऱ्या आदिवासींना अनुसूचित जनजमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६ व २००८ अन्वये वैयक्तिक दाव्यांच्या स्वरूपात येथील २८ वाड्यांतील ४७१ आदिवासींना त्यांचे जमिनीवरील हक्क प्राप्त होऊन त्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दळी जमीन व सामुहिक दाव्यांच्या बाबतीत रायगड जिल्ह्यातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठविला व हा प्रश्न उचलून धरला होता, असे शिवकर यांनी सांगितले.याच प्रश्नासंदर्भात २८ एप्रिल २०१५ ला बरडावाडी येथे झालेल्या राज्यपालांच्या दौऱ्यानंतर दळी व सामूहिक दाव्यांच्या प्रश्नाला चालना मिळून या संदर्भात अनेक दावे सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसह देण्यात आले व याची फलश्रुती म्हणून १६ वाड्यांतील सामूहिक दळी दावे मंजूर करण्यात आले. तर १२ गाव वाड्यांतील सामूहिक दावे मंजूर करण्यात येऊन पाबळ खोऱ्यातील १२ गावे व २९ वाड्यांना याचा लाभ मिळाला आहे. साधारणत: ७४७ हेक्टर दळी जमीन क्षेत्र व ३७७६ हेक्टर सामूहिक दाव्यांमुळे गौण उपजाचे अधिकार प्राप्त झाले असल्याचेही शिवकर यांनी सांगितले. यावेळी आर.बी. खंडागळे, व्ही.एस. पवार, मधुकर महाबळे आदी उपस्थित होते.