शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

तळोजा कारागृह कर्मचाऱ्यांसाठी १८२ नवी घरे; पालघरमध्येही दीड हजार कैदी क्षमतेचे नवे कारागृह

By नारायण जाधव | Published: December 06, 2023 8:11 PM

४१८ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून खर्चास मान्यता

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: येथील तळोजा कारागृह कर्मचाऱ्यांच्या धोकादायक झालेल्या घरांवर गृहविभागाने तोडगा काढला आहे. या ठिकाणी नवी १८२ घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी ७० कोटी २० लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंगळवारी मान्यता देण्यात आली. याशिवाय पालघर येथे दीड हजार कैदी क्षमतेच्या नव्या कारागृहासह ३७५ कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. त्यावर ४१८ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

मुंबईच्या आर्थर रोड, कल्याणचे आधारवाडी आणि ठाणे कारागृहावरील कैद्यांचा भार कमी करण्यासाठी शासनाने नवी मुंबईतील कळंबोली येथे नवे कारागृह बांधले असून ते २००८ पासून कार्यान्वित केले आहे. मात्र, देखभाल दुरुस्ती अभावी गेल्या १५ वर्षांत या कारागृहासह तेथील कर्मचारी निवासस्थानांची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तळोजा तुरुंग परिसरात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तीन-चार मजली १६ इमारती बांधल्या आहेत. यातील दोन इमारती जेलर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तर उर्वरित १४ ते १५ इमारती पोलिस शिपाई व सुभेदारांसाठी आहेत. तेथे शेकडो पोलिस कुटुंबे राहतात. त्यांना या धोकादायक इमारतींमुळे धोका निर्माण झाला आहे.देखभाल दुरुस्ती अभावी इमारतींचे छत गळत असून, भिंतीतून पाणी पाझरत आहे. त्यामुळे प्लास्टर कोसळण्यासारखे प्रकार घडत आहेत. यामुळे येथील इमारतींमध्ये कोंदट व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कुटुंबीयांसह जीव मुठीत घेऊन कर्मचाऱ्यांना राहवे लागत आहे.

७० कोटी २० लाखांचा खर्च

यामुळे यावर तोडगा म्हणून आता तळोजा येथे सरासरी २८ चौरस मीटर क्षेत्राच्या १८२ नव्या सदनिका बांधण्यात येणार आहेत. १४९२० चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर ४१ कोटी ७७ लाख ६० हजार रुपये खर्चून त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर पाणीपुरवठा, अग्निशमन सुविधा आणि इतर बाबींवर ४९ कोटी ४२ लाखावर रक्कम खर्च करण्यात येणार आहे. हा सर्व खर्च ७० कोटी २० लाखावर आहे.

पालघर कारागृहावर ४१९ कोटींचा खर्च

सध्या महामुंबई क्षेत्रात मुंबईचे ऑर्थर रोड, ठाणे, कल्याणचे आधारवाडी आणि तळोजाही कारागृहे आहेत. मात्र, कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ती तुडुंब भरली आहे. यामुळे नव्याने उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यासाठी हक्काचे नवे कारागृह बांधण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. दीड हजार कैदी क्षमतेच्या नव्या कारागृहासह ३७५ कर्मचारी निवासस्थाने पालघरच्या उमरोळी येथे बांधण्यात येणार आहेत. नव्याने उदयास आलेल्या मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील कैदी ठेवण्यास त्याची मदत होणार आहे.

अहमदनगरच्या पारनेरमध्ये नवीन जेल

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या नारायणडोह येथेही ५०० कैदी क्षमतेच्या कारागृहासह १२० कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात मान्यता मिळाली असून त्यावर १७५ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई