शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

खाडीकिनाऱ्यावर ४ वर्षांत २०० स्वच्छता मोहिमा

By नामदेव मोरे | Published: June 16, 2024 6:20 PM

६०० टन कचरा संकलित : पर्यावरण रक्षणासाठी ६० हजार नागरिकांनी दिले योगदान

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : खाडीकिनारा स्वच्छ करण्यासाठी २०२० मध्ये सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाने नॉनस्टॉप २०० आठवड्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. नवी मुंबईत सुरू झालेली ही चळवळ मुंबई, ठाणे, पनवेलपर्यंत पोहोचली असून प्रत्येक रविवारी शेकडो पर्यावरणप्रेमी या अभियानात सहभागी होत आहेत. आतापर्यंत ६० हजार स्वयंसेवकांनी पर्यावरणरक्षणासाठी योगदान दिले आहे. खाडीतून ६०० टन कचरा काढण्यात यश आले आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील अनेक शहरांमधील कचरा नैसर्गिक नाल्यांमधून समुद्रात टाकला जातो. यामध्ये प्लास्टिकसह विघटन न होणाऱ्या विविध प्रकारच्या कचऱ्याचा समावेश असतो. समुद्र हा कचरा भरतीच्या पाण्याबरोबर किनाऱ्याकडे ढकलतो. किनाऱ्यावर या कचऱ्याचे ढीग अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. कोरोना काळात २०२० मध्ये एन्व्हायर्मेंट लाईफ फाउडेशनचे धर्मेश बराई नेरूळमधील टी एस चाणक्यच्या किनाऱ्यावर भटकंतीसाठी गेले असताना तेथील कचरा पाहून व्यथित झाले. स्वत:सह एकूण तीन सहकाऱ्यांनी रविवारी या परिसरात पहिले स्वच्छता अभियान राबविले. या अभियानाची माहिती समाज माध्यमांवर टाकण्यात आली. यानंतर अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी प्रत्येक रविवारी सकाळी ७ ते ९ असे दोन तास खाडीकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी योगदान देण्याचा निश्चय केला. तेव्हापासून सलग चार वर्षे हे अभियान सुरूच आहे.

या रविवारी सारसोळे जेट्टी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाचा हा २०० वा आठवडा होता. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील विविध खाडीकिनारी हे अभियान नियमित राबविले जात आहे. एन्व्हायर्मेंट लाईफ फाउंडेशनच्या मँग्रोव्हज सोल्जर विभागाच्या माध्यमातून हे अभियान आता राबविले जाते. मँग्रोव्हज फाउंडेशन व नवी मुंबई महानगरपालिकेचेही त्यासाठी योगदान लाभत आहे. शहरातील विविध पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थीही खाडीकिनारा स्वच्छ करण्याच्या अभियानात सहभागी होत आहेत. नवी मुंबईसोबत मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर जिल्ह्यामध्येही ही चळवळ पसरली आहे.२०० मोहिमेत यांचा सहभाग

सारसोळे जेट्टी परिसरातील २०० व्या अभियानामध्ये वनशक्ती, बीच प्लीज, स्वच्छ वसुंधरा अभियान व मँग्रोव्हज सोल्जरचे स्वयंसेवक व महानगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, नेरूळचे विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, दिनेश वाघुळदे, एन्हायर्मेंट लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मेश बराई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० मी मोहीम पार पडली.चार वर्षांमध्ये सलग २०० आठवडे हे अभियान राबविण्यात आले आहे. आतापर्यंत चप्पल, थर्माकाॅल, मेडिकल वेस्ट, सौंदर्य प्रसाधनाचा कचरा, खाद्यपदार्थांच्या पिशव्या, पेन, लायटर्स अशा एकूण ६०० टन कचरा संकलित केला आहे. प्रत्येक मोहिमेमध्ये ५० ते २ हजार नागरिक सहभागी होतात. आतापर्यंत ६० हजार नागरिकांनी सहभाग घेतला आहे. धर्मेश बराई, संस्थापक एन्व्हायर्मेंट लाईफ फाउंडेशन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई