शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

ठाणे जिल्ह्यात ५ हजार धोकादायक इमारती

By admin | Published: August 10, 2015 2:22 AM

जिल्हाधिकाऱ्यांच्या २४ तासांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील एकाही महापालिकेने अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची माहिती देण्याचे सौजन्य दाखविले नाही

पंकज रोडेकर, ठाणेजिल्हाधिकाऱ्यांच्या २४ तासांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील एकाही महापालिकेने अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची माहिती देण्याचे सौजन्य दाखविले नाही. तसेच ४८ तास उलटूनही एकाही महापालिकेने त्याबाबत माहिती न दिल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने त्याची माहिती गोळा केली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये सुमारे ५ हजार अतिधोकादायक आाणि धोकादायक इमारतींचे जाळे पसरल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६८३ अतिधोकादायक तर ४२८० धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे लाखोंचे जीव टांगणीला लागले आहेत.भिवंडी अतिधोकादायकमध्ये तर धोकादायक इमारतींत ठाणे महापालिका आघाडीवर आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईत एकही अतिधोकादायक इमारत नसली तरी धोकादायक इमारतींचा आकडा तेथे शंभरच्या घरात पोहोचला आहे. मीरा-भार्इंदरमध्ये एक अतिधोकादायक तर ६ धोकादायक इमारती असल्याचे त्या महापालिकेने दिलेल्या माहितीत नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नौपाड्यातील कृष्ण निवास इमारत दुर्घटनेनंतर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी तातडीने सर्व महापालिकांची विशेष बैठक बोलविली होती. त्या वेळी ठाकुर्ली येथे काही दिवसांपूर्वी पडलेली इमारत आणि नौपाडा येथील इमारत दुर्घटना यांचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे निष्कासन करून त्यांना तात्पुरता निवारा देणे गरजेचे आहे. तसेच महापालिकांना अशा इमारती पाडण्यासाठी पुरेसे पोलीस संरक्षण मिळते का, अशी विचारणा केली. पालिकांनी किती वेळा अशा रीतीने पोलीस संरक्षण मागविल्याची माहितीही (आकस्मिक आराखडा ) २४ तासांत सादर करण्याचे निर्देश त्या वेळी त्यांनी दिले होते. मात्र, एकाही महापालिकेने याबाबत २४ तासांत नाही तर ४८ तास झाल्यानंतरही माहिती सादर केली नव्हती. नाइलाजाने अखेर जिल्हा प्रशासनानेच त्यांच्या पाठीमागे लागून माहिती गोळा केली. त्यात, ठाणे महापालिकेने २८ अतिधोकादायक इमारतींवर क ारवाई केलेली आहे. १४ इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. तर, उर्वरित १६ इमारती रिकाम्या करण्यास पोलिसांना निर्देश दिले असल्याचे सांगितले आहे.