शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

घनकचरा व्यवस्थापनात पन्नास वर्षांचे नियोजन

By admin | Updated: December 27, 2016 02:54 IST

तुर्भे येथील क्षेपणभूमीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण पेटले आहे. क्षेपणभूमीच्या नव्या सेलला स्थानिक रहिवाशांसह लोकप्रतिनिधींकडून विरोध होत आहे. असे असले तरी

नवी मुंबई : तुर्भे येथील क्षेपणभूमीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण पेटले आहे. क्षेपणभूमीच्या नव्या सेलला स्थानिक रहिवाशांसह लोकप्रतिनिधींकडून विरोध होत आहे. असे असले तरी या क्षेपणभूमीत शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. पर्यावरणाचे पुरेपूर संवर्धन केले जाते. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची शास्त्रोक्त पद्धतीने काळजी घेतली जाते. एकूणच शहरातील घनकचऱ्याचे पुढील पन्नास वर्षांचे नियोजन तुर्भे येथील क्षेपणभूमीच्या माध्यमातून करण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.तुर्भे येथे ६५ एकर जागेवर महापालिकेने अत्याधुनिक पध्दतीची क्षेपणभूमी तयार केली आहे. शहरात गोळा होणाऱ्या दैनंदिन घनकचऱ्यावर येथे प्रक्रिया केली जाते. या क्षेपणभूमीचे एकूण सात सेल तयार करण्यात आले आहेत. यापैकी चार सेलची क्षमता संपल्याने ते बंद करण्यात आले आहे. तर सध्या सुरू असलेला पाचवा सेल पुढील सहा महिन्यांपर्यंत वापरता येणार आहे. सहाव्या सेलची जागा ३.३७ एकर व सातव्या सेलची २.५ एकर इतकी आहे. या दोन्ही सेलमध्ये पुढील सात वर्षे घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे ठरावीक कालावधीनंतर बंद केलेल्या सेलचा पुनर्वापर करणे शक्य आहे. त्यामुळे आगामी काळात सेल क्रमांक १ ते ७ चा पुनर्वापर केल्यास पुढील पन्नास वर्षे शहरातील दैनंदिन घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न सुटणार आहे. (प्रतिनिधी)- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला देशभरातील पर्यावरण तज्ज्ञ व संस्थांनी गौरविले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी या प्रकल्पाची प्रशंसा केली आहे. प्रकल्पामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचत नाही. २00५ ते २0१६ या अकरा वर्षांत घनकचरा व्यवस्थापनाचा एक आदर्श नमुना म्हणून हा प्रकल्प देशपातळीवर गौरविला गेला आहे. प्रकल्पाच्या पुढील लॅण्डफील सेलला विरोध करणे संयुक्तिक नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.