शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

५५७ केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा

By admin | Published: February 10, 2017 5:10 AM

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेची पुर्वतयारी सुरु आहे.

प्राची सोनवणे, नवी मुंबईमहाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेची पुर्वतयारी सुरु आहे. ही परीक्षा २८फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत चालणार आहे. एकूण ५५७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागातील ३ लाख, ३८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहे. बुधवारपासून ग्रेड तसेच प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात झाली असून २५फेबृवारीला संपणार आहे.मुंबई विभागीय बोर्डांतर्गत ठाणेमधील १४८, रायगडमधील ३९, पालघरमधील ३५,दक्षिण मुंबईमधील ८७, मुंबई पश्चिम विभागातील १४६, तर मुंबई उत्तर विभागातील १०२ अशा एकूण ५५७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या परीक्षेकरिता एकूण ६८ परीरक्षण केंद्रांची निवड करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची संधीगेल्या वर्षी परीक्षेत अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी १७ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये रिपीटर्स, श्रेणीसुधार तसेच तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार असून अतिविलंब, अतिविशेष, परीक्षा फी वसूल करून परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार आहे. मूळ परीक्षा फी ३२५ रुपये असून, मुदतीनंतर मूळ परीक्षा फीवर प्रतिदिन ५० रुपये व त्यानंतर दिवसाला १०० व २०० रुपये आकारले जातात.