शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

दोन तासात शोधला ६ लाखांचा ऐवज, नेरूळची घटना

By सूर्यकांत वाघमारे | Published: May 14, 2023 9:46 PM

रिक्षातून पडलेल्या बॅगचा घेतला शोध

नवी मुंबई : रिक्षातून प्रवासादरम्यान हरवलेली दागिन्यांची बॅग नेरुळ पोलिसांनी अवघ्या दोन तासाच्या प्रयत्नात शोधून दिली आहे. त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ६ लाखाचा ऐवज होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस रिक्षाचालकापासून ते रिक्षातून पडलेली बॅग उचलनाऱ्यापर्यंत अवघ्या दोन तासात पोहचले. 

जुईनगर येथे राहणाऱ्या सुरेखा फुलसे (५०) यांच्या बाबतीत रविवारी सकाळी हा प्रकार घडला. लातूर येथून त्या बसने नवी मुंबईत आल्या असता, एलपी पुलालगत उतरल्या होत्या. तिथून त्यांनी सोबतचे सर्व साहित्य घेऊन जुईनगर पर्यंत रिक्षाने प्रवास केला. मात्र घरी गेल्यावर केवळ दागिन्यांची बॅग साहित्यामध्ये नसल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी नेरुळ पोलिसठाने गाठले असता पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली.

त्यासाठी सहायक निरीक्षक नितीन खाडे, पोलिस शिपाई गणेश आव्हाड, पुरुषोत्तम भोये, प्रशांत बेलोटे, प्रवीण लहानगे यांचे पथक तयार करण्यात आले. त्यांनी तक्रारदार यांनी केलेल्या उल्लेखाप्रमाणे सीसीटीव्ही तपासून रिक्षाचा शोध घेतला. मात्र रिक्षा चालकाने आपल्याला त्यांची बॅग सापडली नसल्याचे सांगितले. त्यामुळे दागिन्यांची बॅग नेमकी कुठे गेली याचा शोध घेण्याला सुरवात केली.

यासाठी पोलिसांनी एलपी पुलापासून ते जुईनगर पर्यंतच्या प्रवास मार्गावरील प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये एका ठिकाणी रिक्षातून बॅग पडल्याचे व एक व्यक्ती ती बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी सदर परिसरात जाऊन त्या व्यक्तीचा शोध घेतला असता त्या व्यक्तीने देखील ती बॅग सुरक्षित ठेवल्याचे समोर आले.

हि बॅग पोलिस ठाण्यात आणून उघडली असता त्यामध्ये दहा तोळे सोन्याचे दागिने, दहा तोळे चांदीचे दागिने व १६ हजाराची रोकड असा सुमारे ६ लाखाचा ऐवज होता असे पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले. तर अवघ्या दोन तासात पोलिसांनी शीघ्र गतीने तपास करून लाखमोलाचा ऐवज मिळवून दिल्याबद्दल फुलसे यांच्या कुटुंबीयांनी देखील पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई