शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

ओएनजीसीच्या विरोधातील सर्वपक्षीय 9 आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 10:53 IST

९ ऑगस्ट २०२१ रोजी उरण पोलिसांनी उरण न्यायालयात खटलाही दाखल केला होता.

मधुकर ठाकूर 

उरण : नागाव -म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्यावतीने ओएनजीसी विरोधात परिसरातील प्रकल्पग्रस्त्त तरुणांना  कंत्राटी पद्धतीने चालणाऱ्या कामात नोकऱ्या मिळाव्यात यासाठी सर्व पक्षीय आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यातून नऊही आंदोलनकर्त्यांची उरण न्यायालयाने शुक्रवारी अडीच वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे.  

नागाव-म्हातवली परिसरातील बेरोजगार तरुणांना ओएनजीसी प्रकल्पात ठेकेदारी पध्दतीने चालणाऱ्या कामात सामावून घेण्याच्या मागणीसाठी नागाव -म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या वतीने ओएनजीसी विरोधात आंदोलन छेडले होते. आंदोलनानंतर संघटना आणि ओएनजीसी प्रशासन अधिकाऱ्यांच्या बैठकीत आठ बेरोजगार तरुणांना कामावर घेण्याचे मान्यही केले होते.मात्र ओएनजीसीने  दिलेले आश्वासन मुदतीनंतरही पाळले नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागाव -म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या वतीने ओएनजीसी विरोधात आंदोलन छेडले होते.मात्र कोवीड नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवून उरण पोलिसांनी सर्वपक्षीय संघटनेच्या एस. के. पुरो, जनार्दन थळी, भारतराज थळी, जितेंद्र ठाकूर, निलेश कोर्लेकर, घनश्याम ठाकूर, विलास पाटील, राजेश पाटील आदी नऊ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

९ ऑगस्ट २०२१ रोजी उरण पोलिसांनी उरण न्यायालयात खटलाही दाखल केला होता. या खटल्याची मागील अडीच वर्षांपासून सुनावणी सुरू होती.या खटल्याचे कामकाज उरण पंचायत समितीचे माजी सभापती ॲड.सागर कडू ,ॲड. रोहन नाखवा,ॲड. जितेंद्र कात्रने,ॲड.अनुराग ठाकूर या वकील मंडळीने कोणताही आर्थिक मोबदला न घेता  नागाव -म्हातवली प्रकल्पग्रस्त संघटेनेच्या आरोपी पदाधिकाऱ्यांची सुनावणी दरम्यान न्यायालयात भक्कमपणे बाजु मांडली.अखेर याप्रकरणी सुनावणी नंतर उरण न्यायालयाने शुक्रवारी अडीच वर्षांनंतर नऊही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.अशी माहिती ॲड.सागर कडू यांनी निकालानंतर दिली. याप्रकरणी उरण न्यायालयात मागील अडीच वर्षांपासून खटला सुरू असताना  मानसिक पाठबळ देणारे ग्रामस्थ ,मोफत खटला लढविणारे वकील मंडळी या सर्वांचे नागाव -म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेचे नेते काका पाटील यांनी ॠण व्यक्त केले. अखेर सत्याचाच विजय झाला असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHigh Courtउच्च न्यायालयONGCओएनजीसी