शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पातळगंगासह कुंडलीकाचा पर्याय २०५० पर्यंतचे नियोजन सुरू 

By नामदेव मोरे | Published: November 10, 2023 4:58 PM

याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे.

नवी मुंबई : शहरवासीयांना २०५० पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा करता यावा यासाठी महानगरपालिकेने तज्ञ समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून पातळगंगासह कुंडलीकामधील पाणीनवी मुंबईसाठी मिळविता येईल का याची चाचपणी केली जात आहे. याविषयी अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापन केलेल्या समितीची दुसरी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये शहरवासीयांना होणारा पाणी पुरवठा व भविष्यातील गरज यावर चर्चा करण्यात आली. भिरा येथील जलविद्युत प्रकल्पातून कुूंडलीका नदीत सोडण्यात येणारे पाणी शहरांतील नागरिकांसाठी वापरात आणण्यासाठी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून संयुक्त प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यावर चर्चा करण्यात आली. पातळगंगा नदीमध्ये टाटा पॉवरच्यावतीने वीजनिर्मीती केल्यानंतर सोडून देण्यात येणाऱ्या पाण्यामधून १०० दशलक्ष पाणी खोपोली येथून भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाठविण्याविषयी पर्यायाचाही विचार करण्यात आला. पातळगंगा नदीतील उपलब्ध पाण्यासाठी इतर संस्थांनी आरक्षण केले नसेल तर मनपाच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय कुंडलिका नदीवरून पर्यायी शाश्वत स्त्रोताबाबत प्राथमिक अहवाल तयार करण्यात येणार आहे.

या बैठकीला आयुक्त राजेश नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, मनोज पाटील, व्हीजेटीआय मुंबईचे निवृत्त प्राध्यापक डॉ. पी पी भावे , आयआयटीचे ज्योती प्रकाश, मिलींद केळकर, माजी शहर अभियंता मोहन डगावकर, अरविंद शिंदे, सुभाष सोनावणे, सु श वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

पाण्याचा अनाठायी वापर होऊ नये

नवी मुंबईमध्ये इतर शहरांच्या तुलनेमध्ये प्रतीमाणसी अधिक पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे पाण्याचा अनाठायी वापर होण्याची शक्यता आहे. याकडेही लक्ष देण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. भविष्यात ठाणे जिल्ह्यातील १४ गावे महानगरपालिकेत सहभागी झाल्यास त्यांना कराव्या लागणाऱ्या पाणी पुरवठ्याचाही विचार या बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी