शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

एपीएमसीत खासगी वाहनांचे अनधिकृत पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 04:49 IST

खासगी वाहनांवर नियंत्रण नाही : मार्केटमध्ये रिक्षा उभ्या करण्याचे प्रमाणही वाढले

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. मालवाहतुकीबरोबर खासगी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. १०० पेक्षा जास्त रिक्षाही उभ्या केल्या जात असून, बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.

बाजार समितीचे मुख्य प्रशासक सतीश सोनी यांची प्रशासनावरील पकड ढिली झाली आहे. मार्केटमधील कामकाजाला शिस्त लावण्यात अपयश येऊ लागले आहे. वरिष्ठ अधिकारी कार्यालयात बसून राहत असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मार्केटमधील समस्या निदर्शनास येत नाहीत. अनेक दिवसांपासून पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. कांदा मार्केटमध्ये रोज ५० ते ७० रिक्षा अनधिकृतपणे उभ्या केल्या जात आहेत. रिक्षा उभ्या करण्यासाठी परवानगी दिली कोणी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासगी वाहनांची संख्या वाढत असून लिलावगृहामध्येही मोटारसायकल उभ्या केल्या जात आहेत. माल खाली केल्यानंतरही अवजड वाहने मार्केटमध्येच उभी करण्यात येत आहेत. फळ मार्केटमधील स्थिती सर्वात गंभीर झाली आहे. या ठिकाणी खासगी वाहने व मोटारसायकल उभ्या केल्या जाऊ नये, असे फलक लावलेल्या ठिकाणीही वाहने उभी करण्यात येत आहेत. रात्रीही २०० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो व इतर वाहने उभी करण्यात येत आहेत. भाजी मार्केटमध्येही अनधिकृत पार्किंग वाढत आहे.मसाला व धान्य मार्केटमध्ये खासगी वाहने उभी करण्यासाठीचे योग्य नियोजन नाही. पार्किंगचे धोरणच नसल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.समन्वय नाहीएपीएमसीमधील पार्किंगच्या समस्येविषयी काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, व्यापारी-वाहतूकदार व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय राहिलेला नाही. व्यापारी व वाहतूकदारांच्या दबावामुळे अवैध पार्किंगवर ठोस कारवाई करता येत नसल्याचे बोलले जात आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व घटकांशी समन्वय साधून धोरण निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे मत अधिकाºयांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई