शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

नवी मुंबईमध्ये तृतीयपंथींच्या टोळीकडून दोन पोलिसांवर हल्ला

By सूर्यकांत वाघमारे | Published: July 22, 2023 5:41 PM

एपीएमसी पोलिसांकडून परिसरात रात्रगस्त सुरु असताना हा प्रकार घडला आहे.

नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यालगत संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या तृतीयपंथींना हटकल्याने त्यांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. एपीएमसी मधील पुनीत कॉर्नर इमारतीलगत मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाच तृतीयपंथींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

एपीएमसी पोलिसांकडून परिसरात रात्रगस्त सुरु असताना हा प्रकार घडला आहे. माथाडी चौक येथून पुनीत कॉर्नर इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरून बिट मार्शल पोलिस हवालदार विजय सावंत व भगवान गायकर हे कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांना रस्त्यालगत दोन तृतीयपंथी संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी त्यांना तिथे न थांबण्याचा इशारा दिला असता तृतीयपंथींनी त्यांच्यासोबत वाद घातला. त्याचवेळी एका तृतीयपंथीने फोन करून त्यांच्या इतर सहकाऱ्यांना बोलवले असता काही वेळातच तिथे आलेल्या इतर तिघांनी लाकडी दांडक्याने दोन्ही पोलिसांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यामुळे सावंत व गायकर यांनी त्यांना प्रतिकार करत पोलिस ठाण्यातून मदत बोलावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वजण पळू लागले असता दोघांनी इतर नागरिकांच्या मदतीने दोन तृतीयपंथींना पकडून ठेवले.

पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांचे नाव नेहा उर्फ राम पांडे व दीक्षा श्रीराम असल्याचे सांगितले. पोलिसांना केलेल्या मारहाण प्रकरणी या दोन तृतीयपंथींसह त्यांच्या इतर तीन साथीदारांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनीत कॉर्नर परिसरात लांबच्या मार्गावरील ट्रक चालकाची ये जा असल्याचे हेरून त्याठिकाणी देहविक्रीसाठी हे तृतीयपंथी थांबले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर पामबीच मार्गावर कोपरी येथून बोनकोडे कडे जाणाऱ्या मार्गावरील सिग्नल लगत देखील रात्रीच्यावेळी तृतीयपंथी थांबलेले असतात. त्यामुळे त्यांचे अवैध कृत्याचे अड्डे पोलिसांकडून वेळीच उध्वस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी