शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

ग्रामसडक योजनेला निकषांचा बे्रक

By admin | Published: April 04, 2016 2:05 AM

ग्रामीण विभागातील दुर्गम भागाच्या रस्त्यांच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील गुणांकाचे काही निकष हे जाचक आहेत.

आविष्कार देसाई,  अलिबागग्रामीण विभागातील दुर्गम भागाच्या रस्त्यांच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील गुणांकाचे काही निकष हे जाचक आहेत. येत्या चार वर्षांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे २०० किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेतून निर्माण करायचे आहेत. परंतु दुर्गम भागांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा मुळ हेतू जाचक अटींमुळे सफल होणार नसल्याचे दिसून येते.पंतप्रधान ग्राम सडक योजनेप्रमाणेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी म्हणतील त्याप्रमाणे रस्ते तयार होणार नाहीत. तर आवश्यक असणाऱ्या मार्गांचा या योजनेतून विकास साधण्याचा सरकारचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.मुंबईपासून अगदी जवळचा असणारा जिल्हा अशी रायगड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र या रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी रस्त्यांची निर्मिती अद्याप झालेली नाही. पूर्वी लोकप्रतिनिधी त्यांना आवश्यक असलेल्या भागांमध्येच रस्त्यांची निर्मिती आणि दुरुस्ती करायेच. त्यामुळे मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या भागाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये गुणांक पध्दत अवलंबिली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने त्या मार्गावरून एसटी बस जाते की नाही हा निकष अतिशय जाचक आहे. जिल्ह्यातील काही अशी ठिकाण आहेत की, तेथे रस्ताच नाही म्हणून एसटी बस जात नाही आणि एसटी बस येत नाही म्हणून तेथे रस्ता नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे असा निकष येथे अडचणीचा ठरणार आहे.पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निकष बदलण्याची विनंती केली आहे. त्याचप्रमाणे प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधीही मांडली असल्याचे भाजपाचे उपाध्यक्ष सतीश धारप यांनी सांगितले.२०१५-१६ साठी ३३ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०१६-१७ या वर्षात सुमारे ७६ कोटी रुपये खर्चाचे ७३ किलोमीटरचे रस्ते होणार आहेत. मात्र नियोजन समितीला २३ कोटी रुपयेच मंजूर केले आहेत. पुढील चार वर्षांत सुमारे २०० किलोमीटर लांबीचे रस्ते जिल्ह्यात होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागाला होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.