शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

चक्काचूर! भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, पामबीचवर वाहनांच्या वेग ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 4:22 PM

Accident : पामबीच मार्गावरील घटना

नवी मुंबई : पामबीच मार्गावर करावे येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना घडली आहे. रविवारी पहाटेच्या ६ च्या सुमारास हा अपघात घडला असून याप्रकरणी कार चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार चौकात रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात घडला.पामबीच मार्गावर करावे येथील टी. एस. चाणक्य चौकात हा भीषण अपघात घडला. त्यामध्ये मनोजकुमार वर्मा (२५) हा जागीच मृत पावला आहे. तो करावेचा राहणारा असून दूध वितरक आहे. रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो एनआरआय कॉम्प्लेक्स येथे दूध पोचवून दुचाकीवरून परत करावेकडे येत होता. यावेळी चाणक्य चौकात तो करावेकडे वळण घेत असताना वाशीकडून बेलापूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्याला धडक दिली. अपघातावेळी कार अति वेगात असल्याने मनोजकुमार हा दुसऱ्या लेनवर फेकला जाऊन रस्त्यालगच्या झाडीत अडकला. तर कार देखील अनेक पलट्या घेत विरुद्ध दिशेच्या मार्गावर काही अंतरावर जाऊन पडली. परंतु कारमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली असून ऐरबॅगमुळे थोडक्यात त्यांचे प्राण वाचले. अपघातानंतर त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली असता, काहींनी रुग्णवाहिकेला देखील कळवले. तर काही वेळातच वाहतूक पोलीस व एनआरआय पोलीस देखील त्याठिकाणी दाखल झाले.गंभीर जखमी अवस्थेतील मनोजकुमार हा सुमारे अर्धा तास मदतीच्या प्रतीक्षेत पडून होता. अखेर निखिल जाधव हा तरुण खासगी रुग्णवाहिका घेऊन आल्यानंतर मनोजकुमारला झाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत मदतीच्या प्रतीक्षेत त्याने प्राण गमावले होते. या अपघात प्रकरणी कार चालक अक्षय सुर्वे (२५) विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो वाशीचा राहनारा असून त्याने भरधाव वेगात कार पळवल्याने हि दुर्घटना घडली. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.    पामबीचवर रुग्णवाहिकेची कमीपामबीच मार्गावर भरधाव वेगात वाहने पळवली जात असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. अशावेळी जखमीला तात्काळ मदत मिळण्यास त्याचे प्राण वाचू शकतात. परंतु बहुतांश अपघातांमध्ये रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने जखमींवर वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. तर अनेकदा नागरिक वेळेवर उपलब्ध वाहनांमधून जखमीला रुग्णालयात दाखल करतात. त्यामुळे पामबीच मार्गावर एकतरी रुग्णवाहिका कार्यरत ठेवण्याची गरज भासत आहे.

वेगावर नियंत्रण नाहीक्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा पामबीच मार्ग भरधाव वाहनांमुळे जीवघेणा ठरत आहे. चौकांच्या  ठिकाणी सिग्नल असून देखील सिग्नलवर थांबणे काहींना पसंद पडत नाही. त्यामुळे सिग्नल तोडण्यासह, अधिकाधिक वेगात वाहन पळवण्याचा छंद काही चालकांकडून जोपासला जात आहे. त्यातूनच आजवर अनेक अपघात घडले असून त्यात काहींना प्राण देखील गमवावे लागले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूNavi Mumbaiनवी मुंबई